Tuesday, May 21, 2024

Latest Posts

काही जिल्ह्यात अचानक औरंगजेबाच्या औलादी पैदा झाल्या हे शोधावं लागेल – देवेंद्र फडणवीस

कोल्हापूरमध्ये औरंगजेबाच्या स्टेटसवरुन वाद निर्माण झाला होता. त्यावरुन दगडफेकीचा झाल्यानंतर पोलिसांनी कालच जिल्ह्यात जमावबंदी लागू केली होती.

कोल्हापूरमध्ये औरंगजेबाच्या स्टेटसवरुन वाद निर्माण झाला होता. त्यावरुन दगडफेकीचा झाल्यानंतर पोलिसांनी कालच जिल्ह्यात जमावबंदी लागू केली होती. त्यानंतर आज हिंदुत्ववादी संघटनांकडून कोल्हापूर बंद आणि ठिय्या आंदोलनाची हाक देण्यात आली. हे आंदोलन मागे घेण्याची विनंती पोलिसांनी केली होती. मात्र, आंदोलक भूमिकेवर ठाम राहिल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार आणि अश्रूधुराचा वापर करावा लागला. या घटनेनंतर राजकीय नेत्यांनी शांततेचं आवाहन केलं आहे. मात्र यावर देवेंद्र फडणवीस याची मत व्यक्त केले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर च्या राडा संदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधला . यावेळी अचानक औरंग्याच्या इतक्या औलादी या महाराष्ट्रात कुठून पैदा झाल्या? हे आपल्याला शोधावं लागेल, याच्यामागे कोण आहे, हे सुद्धा पाहावं लागेल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. कोल्हापूरमध्ये औरंगाजेबाच्या स्टेटसवरुन वाद निर्माण झाल्यानंतर दगडफेकीचा प्रकार घडला होता. या पार्श्वभूमीवर हिंदुत्ववादी संघटनांकडून कोल्हापूर बंद आणि ठिय्या आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर फडणवीसांनी शांततेचं आव्हान केलं आहे. तरी देखील शांतात आणि सुव्यवस्थेंचे पाळणे केलं नाही तर पोलिसांकडून लाठीचार्ज केला जाईल. आणि त्यांच्या वर योग्य ती कारवाई केली जाईल असे मत देवेंद्र फडणवीस यांनी मांडले.

त्याचबरोबर कोणीही कायदा हातात घेऊ नये, आम्ही कुठल्याही परिस्थितीत औरंग्याच्या औलादींना सोडणार नाही. कोणीही औरंगजेबाचे उदात्तीकरण करु शकणार नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. परंतु महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये कायदा हातात घेतल्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोच, पण औद्योगिक राज्य म्हणून जो नावलौकिक आहे, त्याला डाग लागतो. कोणी कायदा हातात घेतला, तर त्याच्यावर कारवाई करावीच लागेल, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. महाराष्ट्रात औरंगजेबाचं उदात्तीकरण कोणी केलंच, तर साहजिक संताप होतोच, पण त्यासाठी कोणी कायदा हातात घेतला, तर त्याचं समर्थन होऊ शकत नाही. राज्यातील काही जिल्ह्यात अचानक औरंगजेबाच्या औलादी पैदा झाल्या आहेत. जे त्याचे फोटो, स्टेटस ठेवून दुर्भावना निर्माण होत आहे. या कारणाने तणाव निर्माण होत आहे. यामागे कोण आहे, हे शोधावं लागेल, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा:

कोल्हापूर प्रकरणावर कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकरांची प्रतिक्रिया

एकनाथ शिंदे यांच्या कडून कोल्हापूर वासियांना आवाहन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss