१ फेब्रुवारी २०२४ ला देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) अंतरिम बजेट (Budget)सादर करणार आहेत. बजेट सादर केल्यानंतर लोकसभा निवडणूका (Lok Sabha elections) जाहीर होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. नवीन सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर संपूर्ण अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकार अनेक योजनांची तरतूद करतो. तर नवीन योजनांसाठी आर्थिक निधी बाजूला ठेवला जातो. तर या खर्चाचे नियोजन कसे केले जाते ते आपण पाहूया.
आपण घर खर्चसाठी जसे नियोजन करतो तसेच नियोजन केंद्र सरकार करते. खर्चासाठी हा अर्थसंकल्प तयार करण्यात येतो. प्रत्येक वर्षी अर्थमंत्री हा बजेट सादर करतात. त्याआधी सरकार अगोदर आवक किती आहे, महसूल किती जमा होणार या सगळ्याचा अंदाज बांधला जातो. तरीही अनेकदा केंद्रीय रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घ्यावे लागते. त्यानंतर सरकार उत्पन्न आणि कर्ज याचा अंदाज बांधतो. त्याच्याआधारे केंद्रीय बँकेकडून किती कर्ज घ्यायचे याचे नियोजन केले जाते. साधारणता अर्थसंकल्पात सरकारचा खर्च आणि कमाई यांचा लेखाजोखा असतो. तसेच घराच्या बजेटमध्ये किती कमाई, पैसा कुठे खर्च होणार आणि बचत किती होणार या सगळ्याचा अंदाज लावला जातो. दर महिन्याच्या सरावानंतर हा अंदाज लावता येतो. त्यानुसार येणाऱ्या आर्थिक वर्षासाठी पैशाची तरतूद अर्थसंकल्पात केली जाते. मग त्याचे नियोजन त्याचे नियोजन केले जाते. पैशाची आवक आणि जावक याची सांगड घालण्याचा प्रयत्न केला जातो.
हे ही वाचा:
रणबीर-आलियाला मिळाला फिल्मफेअर अवार्ड,नितू कपूर यांनी पोस्ट शेअर करत केलं अभिनंदन
ठाकरे गटाचे खासदार स्पष्टचं बोलले, Raj Thackeray यांचं बरोबर आहे…