Saturday, May 18, 2024

Latest Posts

Nagpurमध्ये घडली थरारक घटना, दोन मित्रांवर धारदार चाकूने केला हल्ला

नागपूरच्या (Nagpur) राजीव नगर बस स्टॉप जवळ असलेल्या एका पण टपरीवर बसलेल्या २ मित्रांवर धारदार चाकूने हल्ला करण्यात आला आहे.

नागपूरच्या (Nagpur) राजीव नगर बस स्टॉप जवळ असलेल्या एका पण टपरीवर बसलेल्या २ मित्रांवर धारदार चाकूने हल्ला करण्यात आला आहे. या हल्यात उपचारा दरम्यान एकाच मृत्यू झाला आहे. ७ ते ८ हल्लेखोरांनी कार मधून उतरून टपरीवर बसलेल्या दोन तरुणांवर धारदार चाकूने हल्ला केला आहे. ही घटना १६ ऑगस्ट रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास घडली. हल्ला झालेल्या तरुणाची नावे राकेश मिश्रा (वय २७), रवी जयस्वाल (वय २८) असे आहेत. यातील राकेश मिश्राचा उपचारादरम्यान खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. हे दोन्ही मित्र आरटीओशी संबंधित कागदपत्र जोडण्याचे कामे करायचे अशी माहिती मिळाली आहे. राकेश आणि रवी दररोज संध्यकाळी बस स्टॉप जवळ असेल्या टपरीवर जाऊन बसायचे. १६ ऑगस्ट रोजी नेहमी प्रमाणे टपरी वर बसले असताना काही ६ ते ७ जण कार मधून उतरले. कारमधून उतरलेल्या सगळ्यांनी तोंडाला रुमाल बांधला होता. राकेश आणि रवी जवळ येऊन ६ते ७ जणांनी त्याचा वर चाकू ने वार केला. वार केल्यानंतर राकेश हा जमिनीवर पडून होता. रवी जीव वाचवण्यासाठी बाजूला असलेल्या एका महिला डॉकटर चा क्लिनिक मध्ये घुसला. आरोपी रवी चा पाठलाग करत त्या डॉक्टरचा केबिन परनंतर पोचले. पण त्या संशयितांनी त्या केबिनची काच फोडून रवीवर हल्ला केला. त्या गुंडानी डॉकटर आणि रुग्णासमोर घुसून रवीला गंभीररित्या जखमी केले आणि ते संशियित कारमध्ये बसून निघून गेले.

नागपूरमधील एमआडीसी पोलिसांना माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस भीमा नरके आणि स्टाफ घटनास्थळी दाखल झाले. हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणांना लता मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घडलेला हा हल्ला कोणी केला आणि कशासाठी केला याचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. हल्ल्यानंतर आरोपी फरार झाले आहेत, आणि पोलीस गुन्हेगारांचा शोध घेत आहे.

हे ही वाचा: आता घरबसल्या सोप्या पद्धतीने काढा Online Passport, जाणून घ्या सविस्तर…

हिमाचल-उत्तराखंडमध्ये देण्यात आला रेड अलर्ट, जाणून घ्या सविस्तर

BIG BOSS OTT winner एल्विश यादवबद्दल आलिया म्हणाली …

Follow Us टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss