Wednesday, May 15, 2024

Latest Posts

“महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणूक,गुजरातमध्ये एकाच टप्प्यात किरण मानेची लक्षवेधी पोस्ट

गेले कित्येक दिवस ज्या दिवसाची सगळे राजकीय मंडळी वाट पाहत होते,तो दिवस आला आणि निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखा ही जाहीर झाल्या.

गेले कित्येक दिवस ज्या दिवसाची सगळे राजकीय मंडळी वाट पाहत होते,तो दिवस आला आणि निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखा ही जाहीर झाल्या.मात्र तारखा जाहीर झाल्यानंतर अनेक चर्चाना ही उधाण आलं.तर यंदा महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे या तारखांना मतदान होणार आहे तर 4 जून रोजी लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे.अशातच आता बेधडक आपलं मत सोशल मीडियावर मांडणारे अभिनेते किरण माने यांनी आताही एक लक्षवेधी पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

किरण माने यांनी नुकतीच त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लोकसभा निवडणुकीबद्दल लिहिलं आहे. या पोस्टमध्ये किरण मानेंनी लिहिलं, “महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणूक… पण गुजरातमध्ये एकाच टप्प्यात? का?? घे की एकाच टप्प्यात हिकडंबी मर्दा. घड्याळवाला अमरीशपुरी, धनुष्यबाणवाला प्रेमचोपडा आणि तुमचा स्वत:चा कवठ्या महांकाळ असतानाबी हिंमत होईना व्हय? हे बरोबर नाय राव.हा न्याय नाही, अन्याय आहे!” किरण मानेंच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी अनेक अशा कमेंट्स केल्या आहेत.

किरण माने यांनी काही दिवसांपू्र्वी त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. त्यांच्या राजकारणातील एन्ट्रीची सोशल मीडियावर बरीच चर्चा देखील झाली. ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत देखील किरण माने हे घराघरात पोहचले.या मालिकेतून त्यांना काढण्यात आल्यानं मोठी कॉन्ट्रॉव्हर्सी निर्माण झाली होती. तर बिग बॉसमधून त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली.

किरण माने हे त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी किरण माने यांनी ‘मुलगी झाली हो’ या मालिकेचा उल्लेख करत एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये किरण माने यांनी प्राजक्ता केळकर आणि श्वेता आंबीकर यांच्यासोबतचा फोटो शेअर केला होता.

या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं होतं, “‘मुलगी झाली हो’ च्या वेळी माझ्यावर खोट्या आरोपांच्या फैरी झडत असताना… अचानक स्वत:च्या करीयरची पर्वा न करता माझ्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहीलेल्या या माझ्या जिगरी मैत्रीणी !”अशी खास पोस्ट त्यांनी शेअर केली होती.सध्या मानेंची खास ओळख आहे ते त्यांच बिन्धास्त आणि रोखटोक बोलणं.

हे ही वाचा:

अंकुश आणि दीपा चौधरीला झी चित्र गौरव पुरस्कार,पोस्ट शेअर करत व्यक्त केल्या भावना

आचारसंहिता लागू झाल्यानंतर राज्यात आचारसंहिता भंगाचा पहिला गुन्हा नांदेडमध्ये दाखल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss