उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज कोल्हापूर येथून माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी चंदगड मतदारसंघात लोकांचा चांगला प्रतिसाद असून देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पंतप्रधान बनवण्याचं मन लोकांनी बनवले असल्याचे सांगितले. तसेच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलेल्या वक्तव्यावर टीका करत त्यांनी “मोदी देशासमोरच संकट नसून त्यांच्यासमोरच संकट आहे,” असेदेखील म्हंटले आहे.
उपमुख्यमंत्री यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते, “चंदगड मतदार संघात लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे लोकांनी देशात मोदींना पंतप्रधान बनवण्याचं मन बनवलेले आहे. कोल्हापूरमध्ये संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांना निवडून देण्याचा निर्णय हा लोकांचा झालेला आहे.” उद्धव ठाकरे आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका करत ते म्हणाले, “मी जें बोललोय ते सत्य बोललोय वारंवार बोलण्याची गरज नाही. मोदी नेहमी फोन करून उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे. देशा समोरच संकट मोदी नाहीत मात्र त्यांच्या समोरच आणि त्यांच्या पक्षासमोरचं संकट मोदी आहेत. पंतप्रधान मोदींवर देशाचं प्रेम आहे. शरद पवार जें बोलले त्याचे उत्तर मतदार जनता मतपेटीतून देईल.”
उद्धव ठाकरे यांनी काल संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांची जाहीर सभेत माफी मागितली. याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, “निश्चितच संभाजीराजे यांचा अवमान झाला. छत्रपती घराण्याबद्दल आदर आहे असं सांगायचं अन अटी शर्थी घालायच्या. सगळं जें काही केलं ते अपमान करण्याकरिताच झालं.”
हे ही वाचा:
Devendra Fadnavis मटण खाणारे ब्राम्हण, त्यांचा शाप लागणार नाही; Nana Patole यांची टीका
संविधानाला संघ आणि मोदींपासून नाही तर विरोधकांपासून धोका, महाराष्ट्र मोदींसोबतच!
Follow Us