Saturday, July 27, 2024

Latest Posts

उल्हासनगरमधील घटनेनंतर अजित पवार संतापले, देवेंद्र फडणवीसांशी चर्चा…

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

कल्याण डोंबिवली शहरात मोठा राजकीय राडा झाला. भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांच्याकडून गोळीबार करण्यात आला आहे. हा गोळीबार शिंदे गटाच्या (Shinde Group) कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर करण्यात आला आहे. हिललाईन पोलीस स्टेशनमध्येच वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या कॅबिनमध्ये गोळीबार झाला आहे. या प्रकरणात भाजप आमदारा गणपत गायकवाड सह, हर्षल केणे, संदीप सर्वांकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात महेश गायकवाडसह दोन जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ ही उडाली आहे. या सर्व घटनेनंतर आता अनेकांनी आपली प्रतिक्रिया द्यायला सुरवात केली आहे. तर या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा: गोळीबारा केल्यानंतर Ganpat Gaikwad यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

यावेळी बोलत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत की, तसेच उल्हासनगर येथील गोळीबारांवरून कुठल्याही लोकप्रतिनिधींनी कायदा हातात घेण्याचे काही काम नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज धुळ्यात त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. उल्हासनगर मध्ये झालेली घटना आपण पाहिली असून भाजपा आमदार वैतागलेल्या माणसासारखे तो बोलत होते, संविधानाने आपल्याला जे अधिकार दिले आहेत, त्याचा कुठेही दुरुपयोग होणार नाही, याची खबरदारी प्रत्येक लोकप्रतिनिधींनी घेतली पाहिजे. मात्र, त्यांच्या बोलण्यात फार वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या असून, रात्री उशिरा त्याबाबत माहिती मिळाली. वास्तविक कुणीही अशा पद्धतीने कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. संविधानानुसार सगळ्यांना नियम आणि कायदे हे सारखेच असतात. कुणाच्या बद्दल काही तक्रार असेल तर मी ती पोलीस स्टेशनला देईल संबंधित घटनेबद्दल देखील आपण माहिती घेणार आहोत. याबाबत आपण गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील बोलणार असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धुळ्यात व्यक्त केली.

नेमकं घडलं काय ?

भाजपा आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यामध्ये अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावातील जागे वरून वाद सुरू होता. एका ५० गुंठे जमिनीचा वाद सुरू होता. मागील ३ दिवसांपासून हे प्रकरण सुरू होते. हा वाद सोडवण्यासाठी उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक पाच हिललाईन पोलीस ठाण्यात दोघांना बोलवण्यात आले. हिललाईन पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या केबिनमध्ये चर्चा सुरू होती. त्यावेळी पुन्हा एकदा दोघांमध्ये वाद निर्माण झाला. त्यानंतर भाजप आमदार गणपत गायकवाड आणि एका साथीदाराने आपल्याकडील बंदूक काढून अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये शिवसेना शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड आणि त्यांचा साथीदार राहुल पाटील यांना गोळ्या लागल्या. महेश गायकवाड यांच्यावर चार तर राहुल पाटील यांना दोन गोळ्या लागल्या. तर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केल्यानं खळबळ उडाली आहे.

हे ही वाचा:

महेश गायकवाड यांच्या संदर्भात डॉक्टरांनी दिले महत्वाचे अपडेट…

पोलिस अधिकाऱ्यासमोर भाजप आमदाराच्या शिंदे गटाच्या नेत्यावर केला गोळीबार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss