बॉलीवूड स्टार सलमान खान (Salman Khan) याच्या वांद्रे निवासस्थानी आज पहाटे (रविवार, १४ एप्रिल) अज्ञात लोकांनी गोळीबार केल्याची घटना (Salman Khan House Fire) समोर आली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून याची दाखल आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खान बरोबर फोनवरून चर्चा करून माहिती घेतल्याचे वृत्त समजत आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून सुरक्षेसंदर्भात दिलासा देण्यात आला आहे.
आज पहाटे पाचच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्तींनि बाईकवरून येत सलमान खानच्या ‘गॅलॅक्सि अपार्टमेंट’ (Galaxy Apartment) या घरावर पिस्तुलांनी फायरिंग केली. सुमारे पाच राउंड्स सलमानच्या घरावर चालवण्यात आले. यातील एक गोळी खिडकीमधून आत गेली असल्याचे समजले आहे. याचा सिसिटीव्ही व्हिडियोही समोर आला असून आरोपींचा शोध सुरु झाला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी सलमान खानबरोबर फोनवरून चर्चा केली आणि त्याच्या सुरक्षेसंदर्भात दिलासा दिला असल्याचे समजते. याशिवाय, मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबई पोलीस आयुक्त यांच्याशीही फोनवरून चर्चा केली असून सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नोव्हेंबर २०२२ मध्ये सलमान खान याला कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोई (Lawrence Bishnoi) आणि गोल्डी ब्रार (Goldi Brar) यांच्याकडून जीवे मारन्याची धमकी आली होती. त्यानंतर, त्याची सुरक्षा वाढवून वाय प्लस करण्यात आली होती. याशिवाय अभिनेत्याला बंदूक बाळगण्याचा परवाना देखील देण्यात आला होता. त्याने बुलेटप्रूफ कारची खरेदीहि केली होती. आता, पोलीस आरोपींच्या शोधात कसून काम करत असून पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे.
यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली असून, “या घटनेचा पोलिसांकडून तपास केला जात आहे. पोलिसांच्या तपासातून खरी माहिती समोर येईल. त्यामुळे पोलिसांचा तपास पूर्ण होईपर्यंत यावर काही सांगता येणार नाही,” असे ते म्हणाले. यावर शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “मुंबईसह महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था उध्वस्त झालीअसून गृहमंत्री राजकारणात व्यस्त आहेत.”