Saturday, July 27, 2024

Latest Posts

Aaditya Thackeray यांनी मुख्यमंत्र्यांना दिले ओपन चॅलेंज, तुम्ही वरळीत या किंवा मी ठाण्यात येतो…

राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या सध्या घडत आहेत शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील वाद काही थांबायचे नाव घेत नाहीत.

राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या सध्या घडत आहेत शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील वाद काही थांबायचे नाव घेत नाहीत. अश्यातच आता पुन्हा एकदा ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ओपन चॅलेंज दिले आहे. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना तुम्ही वरळीतून लढा नाही तर मी ठाण्यातून निवडणूक लढवतो असे आव्हान दिले. त्यानंतर आदित्य ठाकरे विधानसभा निवडणुका ठाण्यातून लढणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.

आज आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना चिमटा काढला आहे. अधिवेशनात अनेक विषय चर्चेला येत आहेत. घटनाबाह्य मुख्यमंत्री यांना इतर राज्यात हाजीर रहा असे सांगितले म्हणून ते राजस्थानला गेले आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महत्वाच्या चर्चेला नव्हते. मी काल AI चा मुद्दा उचलला. एआय हा मोठा घटक आहे . आरोग्य, शिक्षणासाठी एआय महत्वाचे आहे. एआयमुळे गुन्हे वाढू नये, देवेंद्र फडणवीस म्हणाले केंद्र सरकार कायदा तयार करत आहे. AI वापरायचे कसे यावर कसे यावर चर्चा होईल, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

आज निवडणूक होत नाही याला आपण लोकशाही म्हणतो का? आपल्या राज्यात यांनी लोकशाही मारलेली आहे. मी मुख्यमंत्री यांना अनेकदा सांगितले तुम्ही मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या आणि माझ्यासमोर वरळीतून लढा नाहीतर मी तुमच्या समोर ठाण्यातून लढतो, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी केले आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सभागृहात गैरहजर आहेत. धारावीचा विकास होताना एका व्यक्तीचा विकास नको. निवडणुका घ्यायला हे सरकार घाबरते. निवडणुका होत नाहीत, पुणे, चंद्रपुरात निवडणुका नाही सिनेटची निवडणुक देखील हे घेत नाहीत त्यांच्यात हिंमतच नाही. हे घटनाबाह्य सरकार आहे. तसेच या अगोदर अनेकदा आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना ठाण्यातून निवडणूक लढण्याचे चँलेज दिले होते. आता पुन्हा आदित्य ठाकरेंनी आवाहन केल्यानंतर मुख्यमंत्री काय उत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हे ही वाचा:

Nana Patole यांचा थेट हल्लाबोल, भाजप शिवरायांचा महाराष्ट्र पेटवतंय…

संसदेत झालेल्या गोंधळावर संजय राऊतांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss