Wednesday, May 15, 2024

Latest Posts

Congress नेते Jayram Ramesh यांचे PM Narendra Modi ‘तीन’ सवाल, सभेआधी BJP नेते देणार उत्तर?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज सोलार, सातारा आणि कराड येथे सभा होणार आहेत. त्यावरून काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विट करत पंतप्रधान मोदी यांच्यासाठी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. जयराम रमेश यांनी पंतप्रधान मोदी यांना तीन प्रश्न विचारले असून या प्रश्नांची उत्तरे मागितली आहेत. जयराम रमेश यांनी ट्विटरवरून प्रश्न उपस्थित करत म्हंटले,” सातारा आणि सोलापूरमधील पाणीटंचाई दूर करण्यासाठी पंतप्रधानांनी काय केले? १७५० कोटींचा सोलापूर ट्रान्समिशन लाईन प्रकल्प इलेक्टोरल बाँड्सच्या बदल्यात खाजगी कंपनीला दिला गेला का ? पुणे-सातारा आणि सातारा-पंढरपूर महामार्ग उद्घाटनाच्या २-३ वर्षातच का खराब झाला आहे?”

या प्रश्नांचा तपशील देत ते पुढे म्हणाले, “सातारा, सांगली आणि सोलापूरमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे.मार्च व एप्रिल या कालावधीत सांगलीत १३ टक्के,साताऱ्यात ३१ टक्के आणि सोलापूरमध्ये ८४ टक्के टँकरची मागणी वाढली आहे. या परिसरातील धरणे, तलाव आणि नद्या या वेगाने कोरडे होत चाले आहेत हि खूप गंभीर बाब आहे .मागील १० वर्षात भाजपचे २ खासदार असलेल्या सोलापुरातील परिस्थिती तर खुप वाईट आहे. शहराचा मुख्य जलस्त्रोत असलेल्या उजनी धरणातील पाणीपुरवठा शून्याच्या खाली गेला आहे आणि शहरातील पुरवठा सध्या धरणातील “मृत साठा” वर टिकून आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की,सोलापूर महापालिकेला आता आवर्तन पद्धतीने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा लागत असून, शहरातील विविध भागात पाच ते आठ दिवसांच्या अंतराने पाणी मिळत आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये सोलापूरच्या भाजप लोकसभा उमेदवारांनी निवडून आल्यास शहरातील पाणी समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले होते, परंतु स्थानिकांचे असे म्हणणे आहे की त्यांच्या विजयानंतर ते सोलापुरात फारसे दिसले नाहीत आणि पाणी टंचाई सोडवण्यासाठी त्यांनी कधीही काहीही पावले उचलली नाहीत. पीएम मोदी आणि भाजपने दररोज गंभीर अशा पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या हजारो लोकांच्या दुर्दशेकडे का दुर्लक्ष केले? परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांच्याकडे काही ठोस योजना नाही का?”

त्यांनी दुसऱ्या प्रश्नाचा तपशील देत पुढे म्हंटले कि, “फेब्रुवारी २०२४ मध्ये, १,५०० मेगावॅट सोलापूर ट्रान्समिशन लाईन प्रकल्पाचे कंत्राट एका विशिष्ट खाजगी कंपनीला, सरकारी मालकीच्या पीएफसी कन्सल्टिंगने दिले होते. या प्रकल्पातून प्रती वर्ष ५० कोटी रुपये हे ३५ वर्षांसाठी, एकूण रु. १७५० कोटी. मात्र, हे फायदेशीरकंत्राट मिळालेल्या कंपनीने भाजपला मोठ्या प्रमाणात इलेक्टोरल बाँड्स दिले होते. जानेवारी २०२४ मध्ये करार जिंकण्याच्या फक्त १ महिना आधी, त्याने भाजपला ५० कोटी रुपये दिले. हे पंतप्रधानांचा ‘चंदा दो, धंदा लो’ संघटित लूट आणि भ्रष्टाचाराचा भाग आहे का?”

जयराम रमेश यांनी तिसरा प्रश्न उपस्थित करत म्हंटले, “बहुप्रतिक्षित पुणे-सातारा आणि सातारा-पंढरपूर महामार्ग उद्घाटन होऊन अवघ्या दोन ते तीन वर्षातच उखडून पडला आहे. खडी वापरण्याऐवजी ठेकेदाराने रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी स्वस्त दगड आणि काळी माती वापरली, त्यामुळे रस्त्याला तडे गेले आणि काही ठिकाणी तर खड्डेही पडले आहेत. पुलाच्या स्लॅबवर ६५ मिमी जाडीचा थर टाकणे आवश्यक होते परंतु केवळ २५ मिमी थर वापरण्यात आला. शेतकऱ्यांच्या पाईपलाईनसाठी द्यायचे असलेले क्रॉसिंगही बांधले गेले नाहीत. हे काँक्रीटचे रस्ते ४०-५० वर्षे टिकतात‌ .पण स्थानिक नेत्यांचे असे म्हणणे आहे कि अनुभव नसलेल्या कंत्राटदाराने लाच देऊन च हा प्रकल्प मिळवला आहे. अनेक टाळता येण्याजोग्या आणि वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरलेल्या या प्रश्नावर भाजपावाले गप्प का बसले आहेत? हे पण पंतप्रधानांच्या आवडत्या “चंदा दो धंदा लो” योजनेतील आणखी एक प्रकल्प आहे का?” जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हे प्रश्न उपस्थित केले असून आज सोलापूर, सातारा आणि पुणे येथे होणाऱ्या सभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा इतर भाजप नेते यावर भाष्य करणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

हे ही वाचा:

मोदींवर टीका म्हणजे सूर्यावर थोबाड वर करून थुंकणे, Devendra Fadnavis यांची Uddhav Thackeray यांच्यावर टीका

“पहिल्या दोन टप्प्यातील निवडणुकीत इंडिया आघाडीचा डब्बा गुल”;PM Narendra Modi यांची इंडियावर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss