पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची आज सोलापुरात सभा होणार आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार राम सातपुते (Ram Satpute) यांच्या प्रचारार्थ आज (सोमवार, २९ एप्रिल) सभा होणार आहे. त्याअगोदर, देवेंद्र फडणवीस (Devendra Fdnavis) आणि चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हे सोलापुरात पोहोचले आहेत. यावेळी, देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करत, “उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करणे म्हणजे थोबाड वर करून सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे,” असे म्हंटले आहे.
उद्धव ठाकरे यांनी काल (रविवार, २८ एप्रिल) रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्या प्रचारार्थ रत्नागिरी येथे सभा घेतली होती. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींसह भाजप, शिवसेना शिंदेगट आणि महायुतीवर जोरदार हल्लबोल केला. ‘मोदींना मत म्हणजे विनाशाला मत’ असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले होते. यावर प्रतिक्रिया देत देवेंद्र फडणवीस म्हणाले, “उद्धव ठाकरे यांना उत्तर द्यायची आम्हाला गरज नाही कारण, देश पंतप्रधान मोदींनी केलेला विकास पाहत आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांनी केलेल्या एका विकास कामाबद्दल सांगावे. संपूर्ण जीवनात उद्धव ठाकरेंनी केलेले एकतरी विकासकाम दाखवावे. अडीच वर्षे ते मुख्यमंत्रीपदी होते. पण त्यांनी विकासाचं कुठलाच काम केले नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मोदींबद्दल बोलणे म्हणजे सूर्याकडे थोबाड करून थुंकण्याचा प्रकार आहे.”
पुढे ते म्हणाले, “संजय राऊत हि व्यक्ती कोण आहे, ते मला माहित नाही. पण ठाकरेंनी ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेमधून बाहेर आलं पाहिजे आम्ही रामराम करतो याचा शिवसेनेला इतका राग का येतो? भारतामध्ये रामराम करायचे नाहीतर काय पाकिस्तानात करायचे का? आम्ही रामराम म्हणणारच,” असे फडणवीस यांनी सांगितले. सोलापुरात महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते. याआधी देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना आपल्या प्रतिक्रिया दिल्या.
हे ही वाचा:
“पहिल्या दोन टप्प्यातील निवडणुकीत इंडिया आघाडीचा डब्बा गुल”;PM Narendra Modi यांची इंडियावर टीका
Follow Us