Saturday, July 27, 2024

Latest Posts

Dadaji Bhuse यांची विधानसभेत मोठी घोषणा, राज्यातील बसस्थानकांचे रुपडे पालटणार

सध्या राज्याच्या राजकाणार अनेक मोठं मोठ्या घडामोडी या घडत आहेत. तर नागपूर मध्ये राज्याचे हिवाळी अधिवेशन हे सुरु आहे.

सध्या राज्याच्या राजकाणार अनेक मोठं मोठ्या घडामोडी या घडत आहेत. तर नागपूर मध्ये राज्याचे हिवाळी अधिवेशन हे सुरु आहे. राज्यातील बसस्थानकांच्या दुरुस्तीबाबत आमदार लहू कानडे (MLA Lahu Kanade) यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेदरम्यान आमदार प्रकाश आबिटकर (MLA Prakash Abitkar), मनीषा चौधरी (Manisha Chaudhary), सुलभा खोडके (Sulabha Khodke) यांनी उपप्रश्न उपस्थित केले होते. तर या संदर्भात विधानसभेत बोलत असताना सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे (Dadaji Bhuse) यांनी मोठी घोषणा ही केली आहे.

यावेळी बोलत असताना दादाजी भुसे म्हणाले आहेत की, राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (State Road Transport Corporation) २५१ बस आगार, ५७७ बस स्थानके (Bus Station) आहेत. महामंडळाकडे भाडेतत्त्वावर ४६७ बस असून महामंडळाच्या स्व:मालकीच्या १५ हजार ७९५ बसेस आहेत. या बसेसमधून दररोज ५४ लाख प्रवासी प्रवास करीत असतात. एवढे मोठे जाळे असलेल्या महामंडळाच्या बसस्थानकांचे २ महिन्याच्या आत सुशोभीकरण व पायाभूत सुविधांचा विकास करून रूपडे पालटण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे (Dadaji Bhuse) यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली आहे.

मंत्री भुसे पुढे म्हणाले की, राज्यात ४५ बसस्थानकांचे काम बीओटी तत्त्वावर पूर्ण करण्यात आले आहे. तसेच ७२ बसस्थानकांचा विभागाच्या निधीतून विकास करण्यात येत आहे. यामध्ये ७० कामे प्रगतीपथावर आहेत. या वर्षात या कामांसाठी ४०१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामधून ९७ बसस्थानकांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. लोकसहभाग, आपलं गाव -आपलं बसस्थानक या संकल्पनांतूनही बसस्थानके सुशोभित करण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात करण्यात आलेल्या बस स्थानकांच्या कामांची तांत्रिक तपासणी करण्यात येवून यामध्ये दोषी आढळलेल्यांवर कारवाई करण्यात येईल, असेही विधानसभेत बोलतांना मंत्री भुसे म्हणाले.

यावेळी बोलतांना मंत्री भुसे म्हणाले की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत राज्यातील या १९३ बसस्थानकांचे सौंदर्यीकरण व सुशोभीकरण होणार आहे. तसेच बसस्थानकाच्या आवारात काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. यासाठी एमआयडीसी आणि एसटी महामंडळ यांच्या दरम्यान ६०० कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आला. राज्यात १८६ बसस्थानकांचा बीओटी तत्त्वावर विकास करण्यात येणार आहे. आतापर्यंत ११ निविदा काढण्यात आल्या असून, दोन कामांना विकासकांचा प्रतिसाद मिळाला आहे. तसेच ४० निविदा लवकरच काढण्यात येणार आहेत. बीओटी तत्त्वावरील कामांना प्रतिसाद कमी आहे. याबाबत निवृत्त सनदी अधिकारी सुबोध कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीचा महिनाभरात अहवाल येईल, त्यानंतर या पद्धतीतील त्रुटी दूर करून पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही मंत्री भुसे म्हणाले.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss