Saturday, July 27, 2024

Latest Posts

Sanjay Raut यांचा जोरदार हल्लबोल, गौतम अदानी हे भाजपचे उद्योगपती जावई…

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या घडत आहेत. दिनांक १६ डिसेंबर २०२३ रोजी म्हणजे उद्या ठाकरे गटाचा धारावी बचाव मोर्चा निघणार आहे.

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या घडत आहेत. दिनांक १६ डिसेंबर २०२३ रोजी म्हणजे उद्या ठाकरे गटाचा धारावी बचाव मोर्चा निघणार आहे. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. अश्यातच आता उद्योगपती गौतम अदानी यांच्यावरून संजय राऊत यांनी जोरदार हल्लबोल हा केला आहे.

यावेळी सकाळी माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत म्हणाले आहेत की, धारावीसाठी मोर्चा होणारच आहे. तो मोर्चा फक्त धारावीसाठी नाही तर मुंबईकरांसाठी आहे. सगळ्यांवर ताबा मिळवण्यासाठी भाजपचं हे सुरू आहे. देशाचे उद्योगपती जावयांना मुंबई गिळायची आहे. आम्ही ते होऊ देणार नाही. धारावी बचाव मोर्चा होणारच आहे. या मोर्चात मुंबईकर उपस्थित असतील, असं संजय राऊत म्हणालेत. ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर थेट निशाणा साधला आहे. गौतम अदानी हे भाजपचे उद्योगपती जावई आहेत. भाजपच्या जावयाला मुंबई गिळायची आहे. पण आम्ही हे होऊ देणार नाही, असं राऊत म्हणालेत.

राज्याचे दोन उपमुख्यमंत्री कशाकरता दिल्लीत येत आहेत माहीत नाही.दोन्ही उपमुख्यमंत्री येत आहेत. बहुतेक संसदेची सुरक्षा पाहायला येत असतील. बेरोजगारी महागाईचा मुद्दा आहे. कांदा इथेनॉल प्रकरणी राज्यातील लोक आक्रमक आहेत. सरकार अस्थिर आहे. हे सरकार घटनाबाह्य आहे. कोर्टात तारखा पडून घेतल्या जात आहेत. कोर्टाकडून तारखा वाढवत आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर डमरू वाजवत बसले आहेत. एक फुल दोन हाफ हे सरकार… इथ येऊन काय करणार ते? त्यांना दिल्ली मुंबईचा पास काढलेला दिसतोय. त्यांच्या दौऱ्याचा राज्याला काय उपयोग? सगळा खेळ खंडोबा सुरू आहे, असं म्हणत उपमुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यावर संजय राऊतांनी भाष्य केलं आहे.

महाराष्ट्रात आमचं जागावाटप झालं आहे. राज्यात आमचं उत्तम समन्वय आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याशीही बोलणं शेवटच्या टप्प्यात आहे. आम्ही राज्यात ४० प्लस जागा जिंकू. प्रकाश आंबेडकर यांचा सहभाग देशासाठी महत्वाचा आहे, असं म्हणत इंडिया आघाडी आणि आगामी लोकसभेच्या जागा वाटपावर संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. खासदारांच्या निलंबनावर संजय राऊतांनी भाष्य केलंय. जी घटना घडली ती वाईट आहे. ज्या खासदाराने पत्र दिलं. त्याची साधी चौकशी सुद्धा नाही. पण प्रश्न विचारणाऱ्या खासदारांना तुम्ही निलंबित करता. पण ज्याच्यामुळं हे घडल त्याला साधं नोटीस नाही? कारवाई नाही याला काय म्हणायचं? आम्ही आज १० वाजता विरोधी पक्षांचे नेते बसणार आहोत आणि रणनीती ठरवणार आहोत, असं म्हणत राऊतांनी मोदी सरकारवर घणाघात केलाय.

हे ही वाचा:

Nana Patole यांचा थेट हल्लाबोल, भाजप शिवरायांचा महाराष्ट्र पेटवतंय…

संसदेत झालेल्या गोंधळावर संजय राऊतांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss