संजय राऊत यांच्यावर संजय शिरसाट यांनी केली टीका

सध्या राज्यच्या राजकारणात एकमेकांवर आरोप प्रत्यात्यारोप आणि एकमेकांवर टिलसत्र चालू आहे. यातच आता संजय शिरसाट यांनी संजय राऊतांवर टीका केली.

संजय राऊत यांच्यावर संजय शिरसाट यांनी केली टीका

सध्या राज्यच्या राजकारणात एकमेकांवर आरोप प्रत्यात्यारोप आणि एकमेकांवर टिलसत्र चालू आहे. यातच आता संजय शिरसाट यांनी संजय राऊतांवर टीका केली. शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत यांना प्रत्येक पक्षाच्या लोकांनी त्यांची लायकी दाखवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. नाना पटोले म्हणाले, चोंबडेगिरी करू नकोस. अजितदादा पवारांनी सांगितलं की, आमच्या प्रवक्ता बनू नको. आमच्या घरातले प्रश्न आम्ही सोडवू.आम्ही बघून घेऊ त्यामध्ये तुम्ही पडू नका. त्यांच्याबद्दल काय बोलायचं? काहीही न संकल्पना सुचवणारे मूर्ख असे संजय राऊत आहेत. त्यामुळे आता एकटे पडले आहेत, असा घणाघात संजय शिरसाट यांनी केला आहे.

संजय राऊता यांना आपला पक्ष वाचवता आला नाही. ज्याने फक्त पक्ष संपवण्याची सुपारी घेतली. त्यांच्याबद्दल काय बोलावं?, असं टीकास्त्र शिरसाट यांनी डागलं आहे.‘द केरला स्टोरी’ हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केलंय. सिनेमातून महिलांना अपमानित केलं जातंय. केरळ राज्याचा अपमान केला जातोय, असं आव्हाड म्हणाले. त्याला संजय शिरसाट यांनी उत्तर दिलं आहे. जितेंद्र आव्हाड हे मुंब्रा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांना मुस्लिमांची मतं पाहिजे आहे. त्यामुळे अशा प्रकारे ते वक्तव्य करत आहेत. आपल्या आया बहिणींच्या बरोबर रस्त्यावरती पडलेल्या असताना त्यांना अशा प्रकारची विधानं कशी काय सुचतात, असा प्रश्न मला आव्हाडांना विचारायचा आहे, असंही शिरसाट म्हणाले.

हे ही वाचा : 

सुषमा अंधारे शरद पवारांबद्दल बोलताना झाल्या भावुक

कर्नाटकमध्ये काँग्रेस बहुमताने सत्तेत येईल, भाजपाला मात्र… , नाना पटोले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version