आज देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी अंतरिम अर्थसंकल्प (Budget) जाहीर केले. यंदाचे वर्ष हे निवडणुकीचे वर्ष असल्यामुळे २०२४ चा हा शेवटचा बजेट आहे. मोदी सरकारच्या काळातील हा शेवटचा बजेट असणार आहे. जाहीर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये सगळ्यांसाठी योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली आहे.
छगन भुजबळ म्हणाले, शिक्षण, पर्यटन, शेतकरी, महिला, राज्यांना कर्ज देणे, दळणवळण सुधारणे या सर्व आवश्यक सेवांवर अर्थसंकल्पात योग्य लक्ष देण्यात आले आहे. यंदाच्या बजेटवर टीका करण्यासारखे काही नाही. कॉर्पोरेट टॅक्सवर सवलत देण्यात आली आहे. अनेक नवीन विमानेही येतील. लहान-लहान शहरात मेट्रो आणण्याचा प्रयत्न सरकारचा असणार आहे, असे छगन भुजबळ म्हणाले. मत्यास व्यवसाय वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. राज्यांना बिनव्याजी कर्ज, मोफत धान्य देण्याचा देखील मोठा निर्णय घेण्यात आला आहे. उच्चशिक्षण संस्था तयार करणार, पर्यटनस्थळांचे ब्रँडिंग, मोफत वीज, १५ एम्स रुग्णालय हे मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान देण्यासाठी अर्थ सहाय्य देण्यात येणार आहे. सर्व घटकांमध्ये योजना आखण्याचे ठरण्यात आले आहे. हा अर्थसंकल्प अंतरिम जरी असला तरी सर्वसमावेशक असा आहे, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे. मनोज जरांगे यांच्याबद्दल छगन भुजबळ यांना विचारल्यानंतर भुजबळ म्हणाले, सध्या बजेट सुरू आहे तुम्ही तेच दाखवणार आहात, त्या विषयावर नंतर बोलू, असे त्यांनी सांगितले आहे.
मोदी सरकारच्या काळातील हा शेवटचा बजेट असणार आहे. मी काय बोललो शेवटचा. हे सगळे जादूचे प्रयोग सुरु आहेत. अर्थ संकल्प म्हणजे टोपी घालण्याचा प्रकार आहे. निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. मी मागच्या आठवड्यात कल्याण लोकसभा मतदारसंघात फिरलो. आतां म्हटलं तुम्हाला भेटूया. सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये मी जाणार आहे. याची सुरुवात पेणपासून झाली आहे. शेवटचा अर्थसंकल्प मोदी सरकारने सादर केला आहे. निर्मला सीतारामन यांनी जड अंतःकरणाने हा अर्थसंकल्प मांडला आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
हे ही वाचा:
मोदी सरकारच्या काळातील हा शेवटचा अर्थसंकल्प – उद्धव ठाकरे