Monday, April 29, 2024

Latest Posts

UNION BUDGET 2024: महाराष्ट्रासाठी काय मिळालं हा प्रश्न कायम – Rohit Pawar

वास्तविक सरासरी उत्पन्न ५०% ने वाढल्याबद्दल डेटा स्रोत काय आहे? PM-Kisan साठी उद्धृत केलेल्या लाभार्थ्यांची संख्या आणि डेटा संशयास्पद आहे!

१ फेब्रुवारी रोजी २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करण्यात आला. सादर झालेल्या या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष हे लागले होते. केंद्रातील नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा शेवटचा आणि अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांचा सहावा सर्वसाधारण अर्थसंकल्प (Budget) ठरला. सदर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पाबद्दल काही चांगल्या तर काही वाईट प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. आता रोहित पवार (Rohit Pawar) यांनी बजेटबाबत भाष्य केले आहे.

काय म्हणाले रोहित पवार? 

आजच्या शेवटच्या बजेटमध्ये केंद्रीय अर्थमंत्र्यांनी #GYAN या संकल्पनेचा उल्लेख केला आणि त्यासाठी काम करत असल्याचं सांगितलं. पण वास्तविक GYAN मधील G म्हणजे गरीब- महागाईने… Y म्हणजे युवा- बेरोजगारीने.. A म्हणजे अन्नदाता- शेतमालाला भाव नसल्याने… N म्हणजे नारी- अन्याय-अत्याचाराने त्रस्त आहेत. याबाबत मा. अर्थमंत्री महोदयांनी केवळ भाषणबाजी न करता प्रत्यक्ष ग्राऊंड रियालिटीही समजून घ्यायला हवी. महाराष्ट्रासाठी काय मिळालं हा प्रश्नही कायम तसाच आहे!

प्रकाश आंबेडकर सुद्धा झाले व्यक्त 

सरकार फक्त ज्ञान देत आहे पण भारतातील तरुण, गरीब, महिला आणि शेतकरी यांच्यासाठी सरोकार नाही. अर्थमंत्री केवळ स्वत:ला थापा मारण्यात, भाषणबाजीत आणि खोटे बोलण्यात गुंतलेल्या पाहायला मिळाल्या! जर अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करत असेल, तर गेल्या ९ वर्षांत १२,८८,२९३ उच्च-निव्वळ व्यक्ती आणि उद्योजकांनी भारत का सोडला? असा सवाल सोशल मिडियाच्या ‘एक्स’ वर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी विचारला आहे. ७,२५,००० लोकांनी, बहुतेक “व्हायब्रंट गुजरात” मधील लोकांनी बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न का केला? वास्तविक सरासरी उत्पन्न ५०% ने वाढल्याबद्दल डेटा स्रोत काय आहे? PM-Kisan साठी उद्धृत केलेल्या लाभार्थ्यांची संख्या आणि डेटा संशयास्पद आहे! InterimBudget मध्ये फक्त GYAN सादर केले आहे. अशी टीका प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी अर्थसंकल्प आणि सरकारवर केली आहे.

हे ही वाचा:

आगामी लोकसभा निवडणुकीत कळसाला भगवा फडकवायचा आहे – उद्धव ठाकरे

आम्हाला न्याय आणि समान वागणूक का दिली जात नाही? आदित्य ठाकरेंचा सवाल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss