Tuesday, May 14, 2024

Latest Posts

आम्हाला न्याय आणि समान वागणूक का दिली जात नाही? आदित्य ठाकरेंचा सवाल

१ फेब्रुवारी रोजी २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करण्यात आला. सादर झालेल्या या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष हे लागले होते. केंद्रातील नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा शेवटचा आणि अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांचा सहावा सर्वसाधारण अर्थसंकल्प (Budget) ठरला. सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पाबद्दल काही चांगल्या तर काही वाईट प्रतिक्रिया येत आहेत. या बजेटबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, यांच्यासह आदित्य ठाकरे यांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण ह्यांनी #UDAN आणि देशभरात जलदगतीने विमानतळ विस्तारीकरणाबाबत भाष्य केले. तरीही प्रश्न पडतोच, ह्या संपूर्ण योजनेत महाराष्ट्राचा कुठेच समावेश का दिसत नाही? पुणे येथील प्रस्तावित नवीन विमानतळाबाबत त्यांनी एकही शब्द उच्चारला नाही. मविआ सरकारने प्रस्तावित केलेले एक प्रस्ताव सध्या सत्तेत असणाऱ्यांनी रद्द केला. महाराष्ट्राच्या उद्योग, वाणिज्य आणि शेतीला प्रोत्साहन मिळण्यासाठी पुणे येथे नवं विमानतळ आवश्यक आहे. ह्या विमानतळामुळे पश्चिम महाराष्ट्र जगाशी जोडला जाईल. जुन्या पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे काम ५ महिन्यांपासून पूर्ण झाले असून ते उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. घटनाबाह्य मिंधे सरकारला त्याचे उद्घाटन करण्यातही रस नाही. आम्हाला न्याय आणि समान वागणूक का दिली जात नाही? हा अन्याय फक्त महाराष्ट्रावरच का? असा सवाल सोशल मिडियाद्वारे आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी सादर केलेले अंतरिम बजेट (Interim Budget) ही निव्वळ धूळफेक आहे. देशातील बेरोजगारी आणि महागाई कमी करण्यासाठी कोणतीही उपाययोजना या अर्थसंकल्पात नाही. या बजेटमध्ये देशातील दलित आणि आदिवासींसाठी नक्की काय आहे असा प्रश्न मला पडतो. अर्थसंकल्पात सर्वाधिक वेळा पंतप्रधानांचा उल्लेख केला गेला. निराशाजनक, नकारात्मक आणि नाविन्य नसलेला असा हा अर्थसंकल्प आहे. असे मत जयंत पाटील यांनी सोशल मीडियाद्वारे व्यक्त केले.सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हिताचं बजेटमध्ये काहीच नाही. अंतरिम बजेटमध्ये फार मोठ्या अपेक्षा नाहीत. गेल्या दहा वर्षात सरकारने शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही, ते आता तीन महिन्याच्या बजेटमध्ये काय करणार? केलेल्या फुटकळ तरतुदी अत्यंत निराशाजनक असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेतेराजू शेट्टी यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.

हे ही वाचा:

अशोक सराफ यांचा जीवनप्रवास,आणि मजेशीर किस्से

Manipur violence : मणिपूर मध्ये हिंसाचाराचे सत्र सुरूच, गोळीबारात २ मृत्यू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss