रत्नागिरी येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी डॉ. श्रीकांत शिंदे कल्याण लोकसभा मतदारसंघातून विक्रमी मतांनी जिंकून येतील, असा विश्वास व्यक्त केला. ६ एप्रिल अर्थात आज असलेल्या भाजप स्थापना दिवसाचा निमित्ताने रविंद्र चव्हाण म्हणाले की,भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता बूथवर जाऊन मतदारांना समजावून सांगत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा पंतप्रधान होणे ही देशाची गरज असल्याचे रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ याबद्दल बोलतांना रविंद्र चव्हाण म्हणाले की, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे प्रचार कार्यालयाचे आज भाजप स्थापना दिनी या चांगल्या दिवशी भूमिपूजन करण्यात आले. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील उमेदवार फार विचार करून घोषित केला जाईल. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचेच काम सध्या सुरू असल्याचे चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल रवींद्र चव्हाण म्हणाले की, श्रीकांत शिंदे हे एनडीएचे उमेदवार आहेत. दोन महिन्यापूर्वीच आम्ही सर्वांनी डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कामाला सुरुवात केली होती. खासदार श्रीकांत शिंदे विक्रमी मतांनी जिंकून येतील. कल्याण लोकसभा मतदारसंघातून आम्ही कामाला लागलो आहोत. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा झाल्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील आनंद व्यक्त होत असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.
हे ही वाचा:
ठाणे लोकसभा शिंदेंकडे, संजीव नाईकांच्या हाती धनुष्यबाण ? भावी मंत्रिपदासाठी सरनाईकांचे आस्तेकदम
बीफ पार्टी करत मोदी-शहांवर टिका करणारे निरूपम फडणवीसांचे की शिंदेंचे? | Sanjay Nirupam
Follow Us