संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज (शनिवार, १३ एप्रिल) पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल केला. “ऑलिम्पिकमध्ये खोटं बोलण्याची स्पर्धा झाली, तर नरेंद्र मोदींना गोल्ड मेडल मिळेल,” अश्या शब्दांत त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. संजय राऊत यांनी छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि पंतप्रधान मोदींच्या धोरणांवर अत्यंत खोचक शब्दांत टीका केली.
यावेळी संजय राऊत म्हणाले, “कत्तलखान्यांकडून, गोमांस एक्स्पोर्ट करणाऱ्या लोकांकडून ५५० कोटींच्या देणग्या यांनी घेतल्या आहेत. जर ३७० हटवले तर काश्मिरी पंडितांची घरवापसीही व्हायला पाहिजे. मोदींना काश्मिरी पंडितांचे दुःख समजून घ्यायला पाहिजे, ते त्यांनी घेतले नाही. एक नंबरचा खोटारडा पंतप्रधान आहे. ऑलिम्पिकमध्ये खोटं बोलायची स्पर्धा झाली तर मोदींना गोल्ड मेडल मिळेल. ते फेकू चॅम्पियन आहेत. राष्ट्रीय स्तरावर देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) तर आंतरराष्ट्रीय पातळीवर मोदी आणि अंपायर म्हणौन अमित शाह (Amit Shah) यांना घ्यावे लागेल.”
पुढे ते म्हणाले, “देवेंद्र फडणवीस सांगतात कि आमच्याकडे मोदींसारखा चेहरा आहे. तो एवढा भयंकर चेहरा आहे कि लोक घाबरायला लागलेत. ते कधीही टीव्हीवर येतील आणि काहीही घोषणा करतील. याला भुताटकी चेहरा म्हणतात. आता हा चेहरा लोकांना नको आहे, इतकी भयंकर अवस्था झाली आहे.” भाजपच्या ‘अब कि बार, ४०० पार’ या घोषणेवरून संजय राऊत म्हणाले, “४०० पार जायला लोकशाही काय तुमच्या बापाची आहे का? जनता ठरवेल, मोदी ठरवू शकत नाहीत. मोदींनी २०० जागा जिंकल्या तरी खूप आहेत. मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत हि काळ्या दगडावरची रेष आहे.”