Tuesday, May 21, 2024

Latest Posts

उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून उतरवून ही मुलाखत घेत, राउतांनी त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं : नारायण राणे

Narayan Rane Live : शिवसेना खासदार व सामानाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नुकतीच मुलाखत घेतली आहे. त्याचा पहिला भाग मंगळवारी प्रदर्शित करण्यात आला आहे. या मुलाखतीवर भाजपसह अनेकांनी सडकून टीका केली आहे. भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी आपल्या पत्रकार परिषदे मार्फत संजय राउत व उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.

राणे म्हणाले, “मी 2005 मध्ये ज्यावेळी शिवसेना सोडली त्यावेळी मला संपवण्यासाठी अनेकांना सुपाऱ्या देण्यात आल्या होत्या. यामध्ये देशातल्या व देशाबाहेरील गँगश्टर्सचा समावेश होता. मात्र, मी त्यावेळी यावर काहीच बोललो नाही, आणि आता हि मला त्यावर काय बोलायचं नाही कारण या परिस्थितीला तोंड द्यायला समर्थ होतो. या सर्व परिस्थीतीत वाचलो तो केवळ माझ्या आई-वडिलांच्या पुण्याईमुळे वाचलो”,असे भाजप खासदार नारायण राणे यांनी म्हटले.

मला लाईव्ह मॅच पाहायला आवडते, फिक्स मॅच मी पाहत नाही ; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर फडणवीसांची प्रतिक्रिया

उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून उतरवून ही मुलाखत घेत, राउतांनी त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केले आहे. असा म्हणत राणेंनी ठाकरेंवर टीका केली. पुढे म्हणाले, ” ते व्याकूळ झालेत मुख्यमंत्रीपद गेल म्हणून, उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर त्यांना मराठी माणूस, हिंदुत्व शिवसैनिक यांची आता आठवण येत आहे. अडीच वर्षात त्यांना हिंदुत्व आणि मराठी अस्मिता आठवली नाही का ? सत्ता गेल्यावर तडफडत म्हणून आता आहेत, म्हणून त्यांनी व्यथा मांडली. ते व्याकूळ झालेत मुख्यमंत्रीपद गेले म्हणून, उद्धव ठाकरे या व्यक्तीला मी जवळून ओळखतो. गेल्या 40 वर्षांपासून मी ओळखत असून त्यांच्या अंगात दृष्टपणा कपटीपणा, व खोटारडे पणा भरलेला आहे. असा व्यक्ती मुख्यमंत्रीपदी बसवून अडीच वर्षात ना जनतेचे ना शिवसैनिकांचे ना हिंदुत्वाचे भले झाले. सत्तेतील अडीत वर्षात ठाकरेंनी कोणतेच काम केलेले नसून, आजरपण आणि मातोश्री या दोन्हीमध्येच त्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ गेला अशी टीकादेखील त्यांनी केली.

“आजची ठाकरेंची मुलाखत म्हणजे राउतांची प्रश्न पत्रिका व उत्तर पत्रिका पण त्यांचीच, संजय राऊत म्हणजे बनावट पत्रकार असून, त्याची लायकी नाही, त्याला काही दर्जा नसल्याचा घणाघातही राणे यांनी केला आहे. राऊत उद्धव ठाकरेंना त्यांच्या तालावर नाचवत असल्याचेही राणे म्हणाले. शिवसेनेचा वारसा रक्ताने नाहीतर विचाराने चालत असतो. असे राणेंनी म्हंटले आहे.

हेही वाचा : 

‘टायटॅनिक’ व ‘द ओमेन’ चित्रपटातील अभिनेते डेव्हिड वॉर्नर यांचे 80 व्या वर्षी निधन

Latest Posts

Don't Miss