सामनाच्या अग्रलेखातून शिंदे – फडणवीस सरकारवर हल्लाबोल

कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालांमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरणही ढवळून निघालं आहे. राजकारणी एकमेकांवर हेवेदावे करताना दिसत आहे त्याचप्रमाणे अनेक राजकारण्यांच्या मते कर्नाटकात ज्याप्रमाणे क्रांतोय घडली अगदी तशीच क्रांती महाराष्टरही घडू शकता अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सामनाच्या अग्रलेखातून शिंदे – फडणवीस सरकारवर हल्लाबोल

कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालांमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरणही ढवळून निघालं आहे. राजकारणी एकमेकांवर हेवेदावे करताना दिसत आहे त्याचप्रमाणे अनेक राजकारण्यांच्या मते कर्नाटकात ज्याप्रमाणे क्रांतोय घडली अगदी तशीच क्रांती महाराष्टरही घडू शकता अशी शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय विधानाला धरून करखोड्या सुरू असतानाच राज्याच्या काही भागांत दंगलसदृश्य तणावाची परिस्थिती निर्माण झाली. यावरून पुन्हा राजकीय आरोप-प्रत्यारोप आता सुरू झाले आहेत. यासंदर्भात ठाकरे गटानं राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारबरोबरच केंद्रातील मोदी सरकारवरही हल्लाबोल केला आहे. अकोला, नगर आणि त्र्यंबकेश्वरमधील घटनांचा हवाला देत “राज्यात मिंधे सरकार आल्यापासून दंगलींचे प्रमाण वाढले आहे, असा गंभीर आरोप सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.

“महाराष्ट्रात मिंधे-फडणवीसांचे सरकार आल्यापासून जातीय आणि धार्मिक दंगलींचे प्रमाण वाढले आहे. मुख्यमंत्री शिंदे हे दौऱ्यावरआहेत आणि गृहमंत्री फडणवीस हे नावापुरतेच राजकारणात दिसत आहेत. दंगली पेटवून राजकीय भाकऱ्या शेकायच्या हा भाजपचा पिढीजात धंदा आहे व निवडणुका जवळ आल्या की या धंद्यातील गुंतवणुकीत वाढ कशी करता येईल याकडे त्यांचे जास्त लक्ष केंद्रित केलेले असते. असे गुंतवणूकदार आता आपल्या राज्यात आले आहेत. आणि काही अंशी ते त्यांच्या कार्यात यश देखील संपादन करत आहे. म्हणूनच आम्हाला महाराष्ट्राच्या भवितव्याची चिंता वाटते, असं सामनाच्या अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील घटनेवर भूमिका मांडताना काही मुस्लिम मंडळींनी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर दरवाजाने आत घुसून चादर चढवण्याचा प्रयत्न केला. भारतीय जनता पक्षातील ‘दंगल-तणाव-भडकाव महामंडळा’ने यावर लगेच आपापले भोंगे वाजवून राजकीय ‘जनजागृती’चे कार्य हाती घेतले. प्रश्न धार्मिक भावनांचा आहे. अजमेर शरीफ दर्ग्यावर पंतप्रधानांपासून बरेच भाजप नेते श्रद्धेची चादर चढवीत असतात, पण ती त्यांची प्रतीके आहेत. हिंदू देवतांवर चादर चढविण्याच्या पद्धती नाहीत.महाराष्ट्रात धार्मिक सलोखा चांगल्या पद्धतीने निर्माण झाला असताना कोणाला तरी या सद्भावनेला चूड लावायची इच्छा दिसत आहे”, असं ठाकरे गटानं नमूद केलं आहे.

काही लोक आगीत तेल वगैरे ओतण्याचे काम करीत आहेत. त्यांचे चेहरे मी लवकरच बाहेर आणेन, असा इशारा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. पण त्यांचे बोलणे सध्या फेल ठरत आहे. भाजप हा भ्रष्टाचाऱ्यांना शुद्ध करून घेणारा व दंगली घडविणारा कारखाना आहे”, असा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. शिवसेना फोडून राज्य केले जात आहे, त्याप्रमाणे समाज फोडून त्यांना निवडणुका लढवायच्या असाव्यात. भारतीय संविधान, राष्ट्रीय एकात्मता, धार्मिक सलोखा यांची ऐशी की तैशी करून सत्ता भोगणार गारदी सभोवती वावरत आहेत”, असंही अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे. या अग्रलेखातून आता कोणते नवीन वाद राज्यात निर्माण होतील यावर राजकारणी काय म्हणतील याकडे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा : 

गिरीश महाजनांच्या वाढदिवसाच्या जाहिरातीमध्ये कोण कोण राजकारणी दिसले एक बॅनरखाली; चर्चाना उधाण

कुरुलकरांच्या पाठोपाठ निखिल शेंडेही पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या जाळ्यात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version