Monday, May 20, 2024

Latest Posts

मराठी मतदारांना आवाहन करण्यामागे राजकीय हेतू आहे का? Chitra Wagh यांचा Renuka Shahane यांना सवाल

मुंबईतील गिरगाव आणि घाटकोपर परिसरात घडलेल्या घटनांवरून अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी मराठी माणसाला डावलणाऱ्या व्यक्तींना मत देऊ नका, असे आवाहन केले होते. मराठी ‘नॉट वेलकम’ म्हणणाऱ्या आणि मराठी लोकांना घरं न देणाऱ्या लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना कृपया आपलं बहुमूल्य मत देऊ नका, असे रेणुका शहाणे यांनी सांगितलं होतं. त्यानंतर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी जाहीर पत्र लिहून काही प्रश्न विचारले आहेत. हे पत्र सध्या चर्चेचा विषय बनले आहे.

ज्यांनी मुंबईकर कोरोनाच्या संकटात असताना करोडो रूपये लुटून खाल्ले आणि मराठी शाळांना टाळे लावले मात्र उर्दू भवन बांधण्यासाठी अतिउत्साह दाखवला अशा व्यक्तीच्या कृत्याचे तो फक्त मराठी आहे म्हणून आपण समर्थन करता का..? यावर उघड भूमिका घेणार की राजकीय विषय म्हणून बगल देणार..? असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारला आहे.

पत्रात नेमकं काय म्हणाल्या चित्रा वाघ? 

मा. रेणुकाताई शहाणे
जय महाराष्ट्र,

आम्ही सर्व आपले खुप मोठे चाहते आहोत, ‘सुरभी’ या कार्यक्रमातून आपण अखंड भारताच्या विविध भाषा, परंपरा, खाद्यसंस्कृती, वेषभूषा याचे घरबसल्या भ्रमण करविले आणि दर्शन घडवले. त्याचा आम्हाला अभिमान व कौतुकच आहे. भारतीय विविधतेला एका माळेत गुंफवून ठेवणारा धागा ‘राष्ट्रीयत्वाचा’ आहे, मला खात्री आहे, याची आपल्याला जाणीव असेलच. मराठी भाषा ही सदैव आमची मायबोली आहे. तिचा मान राखणे हे आमचे प्रथम कर्तव्य आहे. आपण ट्विट मधून मराठी मतदारांना केलेल्या आवाहनाचे टायमिंग पाहता यामागील आपला राजकीय हेतू आहे का? हा संशोधनाचा विषय असू शकतो.

असो, तसेच जर एखादा व्यक्ती मराठी असल्यामुळे त्याला घर व नोकरी नाकारली जात असेल तर त्याचा मी निषेधच करते. पण मी आपणास विचारू इच्छीते की आपण घाटकोपरमधील सोसायटीमधे स्वःत खात्री केली होती का? कारण माझ्या माहितीस्तव त्या सोसायटीत समान संख्येने मराठी परिवारही गुण्यागोविंदाने नांदतात. मी परत सांगते, मराठी भाषेचा आदर केला पाहिजेच पण तिचा वापर फक्त राजकीय हेतु करिता होता कामा नये. भाषा ही लोकांना जोडते. ती मराठी असो की राष्ट्रभाषा असो. हे तुमच्यापेक्षा कोण चांगल्या पद्धतीने सांगू शकते. कारण आपण जीवनसाथी निवडताना दुसर्‍या भाषेचा आदरच केला आहे.

आपणास एक प्रश्न विचारते की कोविडमधे पीपीई किट्स, बॉडी बॅग्स, मास्क, औषधे यात टक्केवारी खाल्ली आणि मराठी माणूस ऑक्सिजन अभावी मरत असताना करोडो रूपयांचे ऑक्सिजन प्लॅट्स फक्त कागदावरच लूटून खाल्ले. तसेच आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात उर्दू भवन बांधण्यात अतिउत्साह दाखविला पण बीएमसीच्या अर्ध्या अधिक मराठी शाळांना टाळे लावले. अशा व्यक्तीच्या कृत्याचे तो फक्त मराठी आहे म्हणून आपण समर्थन करता का? नसल्यास त्याबाबत आपण उघड भूमिका केव्हा घेणार? आता त्याला राजकारणाचा भाग आहे म्हणून त्यावर आपण हेतुपुरस्सर मौन बाळगणार का?

काय म्हणाल्या होत्या अभिनेत्री रेणुका शहाणे? 

मराठी “not welcome” म्हणणार्‍या लोकांना कृपया मत देऊ नका. मराठी लोकांना घरं न देणाऱ्या लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना कृपया आपलं बहुमूल्य मत देऊ नका. ज्यांच्या कामाच्या ठिकाणी मराठी भाषा किंवा लोकांना कमी लेखलं जातं, अशा लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना किंवा पक्षाला कृपया मत देऊ नका. कुठल्याही जाती, धर्म किंवा भाषेच्या विरुद्ध मी नाही, पण जे आपल्याच महाराष्ट्रात, आपल्या भाषेचा आणि संस्कृतीचा मान ठेवत नाहीत, अशा लोकांना, शांतपणे, मत न देऊन, त्यांची चूक दाखवून दिलीच पाहिजे. 

हे ही वाचा:

EXCLUSIVE CM Eknath Shinde: उंटावरून शेळ्या हाकता येतात का? मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

Exclusive Eknath Shinde: विरोधकांनी माझ्या कामाचा धसका घेतला कारण…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss