दरवर्षी अर्थसंकल्पाचे सादर करण्यापूर्वी सरकारद्वारे (government) वित्तीय वर्षांतील सरकारचे अंदाजे खर्च व उत्पन्न यांची सर्व माहिती व त्याचबरोबर गतवर्षांच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा सादर केला जातो. म्हणजेच देशाच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात वर्षभराच्या खर्चाचा आणि उत्पन्नाचा हिशोब सरकारकडून जनतेसमोर मांडला जातो. यालाच अर्थसंकल्प असे म्हंटले जाते. हा अर्थसंकल्प देशाच्या केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून लोकसभेत सादर केले जाते. त्याचप्रमाणे २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर होण्यासाठी काहीच दिवस बाकी आहेत. या वर्षी १ फेब्रुवारी २०२३ रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. पण तुम्हाला देशाच्या बजेट पद्धतीच्या रंजक गोष्टी माहित आहेत का तर,या आपण जाणून घेऊयात बजेट संदर्भातील रंजक गोष्टी
१ फेब्रुवारी २०२३ रोजी देशाच्या अर्थ मंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) लोकसभेत पाचव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या संकल्पात देशातील विविध भागाच्या वर्षभराच्या खर्चाचे नियोजन असेल. भारतातील अर्थव्यवस्था हि जगभरातील अर्थव्यवस्थेपेक्षा सातत्याने वाढणारी अर्थव्यवस्था राहिली आहे. तसेच आता सामान्य लोक या अर्थसंकल्पाची (budget) आतुरतेने वाट बघत आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ कशी झाली हे आपण बघुयात
आपल्याला अर्थसंकल्पा विषयी माहिती असते परंतु हा अर्थसंकल्पाची सुरवात कुठून झाली हे आपल्याला माहित नसते. भारत देशात सर्वात प्रथम प्राध्यापक प्रशांत चंद्र महाल निबिस यांनी केंद्रीय अर्थसंकल्पनेची संकल्पना तयार केली होती. प्रा प्रशांत चंद्र महालनोबीस (Prasanta Chandra Mahalanobis)हे शास्त्रज्ञा होते तसेच भारताच्या नियोजन आयोगाच्या प्रमुख सदस्यांपैकी एक होते. त्यांचा भारतीय अर्थसंकल्प तयार करण्यात मोलाचा वाटा आहे.
हे ही वाचा:
Republic Day 2023, ‘या’ ठिकाणी पार पडले होते ‘प्रजासत्ताक दिना’चे पहिले संचलन
Republic Day 2023, गाडीला तिरंगा लावत आहात? परंतु कोणत्या बाजूने लावतात तुम्हाला माहित आहेत का ?