छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.मालिकेतील कलाकारांवर देखील प्रेक्षक भरभरुन पसंती दर्शवतात.या मालिकेनं आतापर्यंत अनेक एपिसोडचा टप्पा पार केला आहे.मात्र आता नुकतीच या मालिकेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार का, अशी चर्चा सुरू आहे. सध्या या मालिकेत काही ट्वीस्ट येत आहेत. मालिका संपण्याची चर्चा एका कारणाने सुरू झाली आहे. ‘आई कुठं काय करते’या मालिकेच्या वेळेत नवीन मालिका सुरू होणार आहे. त्यामुळे, ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
सध्या छोट्या पडद्यावर टीआरपीची मोठी स्पर्धा सुरू आहे. स्टार प्रवाह वाहिनी मागील 175 आठवड्यांपासून टीआरपीमध्ये अव्वलस्थानी आहे. आता छोट्या पडद्यावर अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.’आई कुठे काय करते’ या मालिकेच्या वेळेत स्टार प्रवाहवर नवी मालिका सुरू होणार आहे. घरोघरी मातीच्या चुली ही नवी मालिका सुरू होत आहे. पुढील महिन्यात 18 मार्चपासून ही मालिका सोमवार ते शनिवार दरम्यान संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. त्यामुळे आता ‘आई कुठं काय करते’ ही मालिका बंद होणार का, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
सध्या ‘आई कुठं काय करते’ या मालिकेत प्रत्येक पात्राच्या आयुष्यात काही ना काही उलथापालथी सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. आशुतोषसोबत नवा संसार सुरु केल्यानंतर अरुंधतीच्या वाट्याला रोज नवं काहीतरी येत होतं. तर आता पुन्हा एकदा तिच्या संसारात एक नवं वादळ आल्याचं पाहायला मिळत आहे. आता पुन्हा एकदा अरुंधती आणि आशुतोषच्या नात्यात दुरावा येणार का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत.
नव्याने सुरू होणाऱ्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत जानकी हे महत्त्वाचं पात्र रेश्मा शिंदे साकारणार आहे. ‘रंग माझा वेगळा’ या मालिके रेश्माची मुख्य भूमिका होती. ही मालिका कौटुंबिक जिव्हाळा, नातेसंबंधावर भाष्य करणारी असणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये रेश्माला नव्या भूमिकेत पाहण्याची उस्तुकत्ता देखील आहे.
हे ही वाचा:
पॅराग्लायडिंगच्या पंढरीत रंगणार साहसी क्रीडाप्रकाराचा मेळा
केसांच्या समस्या दुर करायच्या असतील तर तुरटी ठरु शकते फायदेशीर,जाणुन घ्या फायदे
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.