Monday, May 20, 2024

Latest Posts

संजय राऊतांना लॉरेन्स बिष्णोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी; मोबाईलवर आला मेसेज!

राज्याच्या राजकारणात नवीन भर म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.तसेच संजय राऊत याना आलेल्या मेसेजमध्ये स्पष्टपणे तुम्ही दिल्लीमध्ये आल्यानंतर तुम्हाला AK -४७ ने उडवून टाकू असा मेसेजमधून उल्लेख करण्यात आला आहे.

सध्याचा राजकारणात खूप मोठ्मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. राजकारण हे गुंडप्रवृत्तीचे होताना बघायला मिळत आहे. राज्याच्या राजकारणात नवीन भर म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.तसेच संजय राऊत याना आलेल्या मेसेजमध्ये स्पष्टपणे तुम्ही दिल्लीमध्ये आल्यानंतर तुम्हाला AK -४७ ने उडवून टाकू असा मेसेजमधून उल्लेख करण्यात आला आहे. तसेच याबाबतची शहानिशा पोलिसांकडून करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच संजय राऊत याना आलेल्या मेसेजद्वारे शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यावर संजय राऊत स्वतः प्रसारमाध्यमांशी बोलणार असल्याचे संजय राऊतांनी स्पष्ट केले आहे.

धमकी संदर्भात संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी थेट संवाद साधला. संजय राऊत म्हणाले, आम्हाला धमक्या येत असतात परंतु विरोधकांना आलेल्या धमक्यांवर सरकार गांभीर्याने लक्ष घालत नाही. असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर विरोधकांच्या सुरक्षा या काढण्यात आल्या .माझी स्वतःची सुरक्षा काढली पण तरी देखील या संदर्भात एकही उदगार काढला नाही आणि कोणासोबत कोणताही पत्रव्यवहार देखील केला नाही. आपल्या राज्यातील संपूर्ण पोलीस यंत्रणा हि शिंदे – फडणवीस सरकारसाठी कमला लागली आहे असा थेट निशाणा संजय राऊत यांनी यावेळी शिंदे फडणवीस सरकारवर साधला. राज्याचे मंत्री आणि गृहमंत्रीयांचा गांभीर्याने विचार ना करता दुर्लक्ष करत आहे, तसेच राज्याचे गृहमंत्री विरोधकाना आलेल्या धमक्यांवर चेष्ठा करतातअसे देखील राऊत यावेळी म्हणाले. अशाप्रकारच्या गुंड प्रवृत्तीच्या धमक्या आम्हाला अनेक वेळा आल्या. परंतु आम्हाला मिळणाऱ्या धमक्या या निव्वळ स्टँडबाजी साठी करतो असे मानले जाते. त्यामुळेच विरोधकांना मिळणाऱ्या धमक्यांकडे गृहमंत्री दुर्लक्ष घालत नाही असे संजय राऊतांचे स्पष्ट मत आहे.


तसेच प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत असे देखील म्हणाले, सलमान खानला ज्या गॅंग कडून धमकी येत आहे त्यांच्या कडून मला देखील धमकी मिळाली आहे अशी माहिती मला समजली आहे तरी मी या बद्दलची शहानिशा करणार आहे. मी एक नागरिक आहे या नात्याने तसेच खासदार म्हणून मी या संदर्भातील संपूर्ण माहिती पोलिसांकडे दिली आहे असे देखील राऊत यांनी सांगितले. संजय राऊत यांनी शिंदे फडणवीस सरकार हे गेंड्याच्या कातडीचे आहे. त्यांना देशात राज्यात काय चाललं आहे याचा काही फरक पडत नाही,असे मत त्यांनी यावेळेस मांडले. या देशात शिंदे फडणवीस सरकारमध्ये दहशतवाद आणि दंगली सुरु आहे, त्यांना फक्त सत्ता हवी आहे, इतरांच्या जीवाची त्यांना पर्वा उरलेली नाही असे ठाम मत त्यांनी यावेळेस व्यक्त केले. संजय राऊत म्हणले माझे कर्तव्य आहे कि याबाबतची माहिती पोलिसांना कळवावी नाही तर पुन्हा म्हणतील तुम्ही सांगितलं नाही म्ह्णून मी या संदर्भात खुलासा केला. समोर आलेल्या माहितीनुसार कांजूरमार्ग पोलीस पथक चौकशीसाठी संजय राऊत त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहे.

हे ही वाचा : 

संजय राऊतांना लॉरेन्स बिष्णोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी; मोबाईलवर आला मेसेज!

पोलिसांवर दबाव आणला जातोय, त्यांना चुकीच्या कारवाया करण्यास भाग पाडले जात आहे – नाना पटोले

नवीन आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये 1st April पासून नवीन नियम लागू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss