Wednesday, May 8, 2024

Latest Posts

Rang Maza Vegla मालिकेत कार्तिक घेणार का दीपाचा जीव?

स्टार प्रवाह वरील 'रंग माझा वेगळा' या मालिकेने सर्वांच्याच मनात घर केले आहे. परंतु ही मालिका आता रंजक वळणावर आली आहे.

स्टार प्रवाह वरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेने सर्वांच्याच मनात घर केले आहे. परंतु ही मालिका आता रंजक वळणावर आली आहे. या मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे. १४ वर्षांची शिक्षा भोगून आल्यानंतर कार्तिक दीपासोबत गुण्या गोविंदाने राहून , खोटं बोलत होता. पण आता हे सत्य दीपाला कळलं आहे. त्यामुळे आता कार्तिक-दीपाच्या नात्याची आता नव्याने सुरुवात होणार की तो तिचा जीव घेणार हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहे.

१४ वर्षांनंतर कार्तिक हा झेल मधून बाहेर येतो. परंतु तो दीपसोबत खोटं बोलत असतो. त्याला तिचा खूप जास्त राग येत असतो आणि त्याच हे सत्य अखेर दीपाला समजते. कार्तिक दीपाला वेडं ठरवण्याचा प्रयत्न करत होता. हे सर्व सत्य समजल्यानंतर दीपाने देखील कार्तिकला धडा शिकवण्याचं ठरवलं आहे. कार्तिकचा डाव लक्षात आल्यानंतर आता दीपा त्याला त्याच्याच भाषेत उत्तर देताना दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 दीपावर आपलं किती प्रेम आहे, हे दाखवण्यासाठी कार्तिक तिला बाहेर फिरायला घेऊन जाणार आहे. आपल्याला वेड लागलेलं नसून हा कार्तिकचा प्लॅन आहे, हे दीपाच्या लक्षात आलं आहे. त्यामुळे दीपा आता मालिकेच्या आगामी भागात कार्तिकला त्याच्याच भाषेत उत्तर देताना दिसणार आहे. कार्तिक दीपाला डेटवर घेऊन जाणार आहे. दरम्यान तो तिचा जीव घ्यायचा प्रयत्न करणार आहे. दुसरीकडे कार्तिकच्या मनातील गोष्टी त्याच्या ओठांवर आणण्यासाठी दीपा त्याच्या हातात बंदूक देऊन स्वतःवर गोळी झाडण्यास सांगणार आहे. त्यामुळे आपला प्लॅन दीपाच्या लक्षात आला हे आता कार्तिकला कळणार आहे.

‘रंग माझा वेगळा’ या मालिकेचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये दीपा बंदूक देत म्हणत आहे,”हे घे… मार मला…तुला माझ्यावर सूड उगवायचा होता ना..त्यासाठीच कार्तिक तू मला वेडं ठरवत होतास ना… मारुन टाक मला…मार ना… त्यानंतर कार्तिक बंदूक उचलतो आणि दीपाच्या कपाळावर ठेवतो. पण लगेचच तो गोळी न मारता तिच्या पायाजवळ बसतो. त्यावेळी दीपा म्हणत आहे,”मला माहिती होतं, कार्तिकचं त्याच्या दीपावर खूप प्रेम आहे. त्या प्रेमामुळेच तू मला मारू शकला नाहीस.

कार्तिक आता दीपाचा जीव घेणार की, तिची माफी मागून पुन्हा एकदा नव्याने आपलं आयुष्य सुरू करणार का? हे ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेच्या आगामी भागांमधून प्रेक्षकांना कळेल. त्यामुळे मालिकेच्या आगामी भागांची मालिकाप्रेमींना आता उत्सुकता आहे.

हे ही वाचा : 

मविआ ची ‘वज्रमूठ’ सभा पुन्हा एकदा सुरू करणार, जयंत पाटील

Sharad Pawar यांनी बोलावली मविआ ची महत्वाची बैठक, जागा वाटपावर चर्चा होणार?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो कर.

Latest Posts

Don't Miss