Saturday, May 4, 2024

Latest Posts

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे: परराष्ट्र मंत्री एस जयशंकर

अलीकडच्या काळात भारताने डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे अन्न सुरक्षा प्रणाली यशस्वीरित्या अपग्रेड केली आहे. याद्वारे सामान्य जनतेपर्यंत अन्नधान्य पोहोचलं आहे.

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (External Affairs Minister S Jaishankar) सध्या न्यूयॉर्क (Newyork) दौऱ्यावर आहेत. त्यांनी संयुक्त राष्ट्र महासभेला (UN General Assembly) संबोधित करण्यापूर्वी शनिवारी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर ‘भारत@75: इंडिया-यूएन पार्टनरशिप इन एक्शन’ (India@75: India-UN Partnership in Action) या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये पोहोचले होते. यावेळी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे. अठराव्या शतकापर्यंत भारत हा जगाच्या अर्थव्यवसथेत एकूण एक चतुर्थांश इतके योगदान देत होता. परंतु विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत भारतातील गुलामगिरीमुळे परिस्थिती बिघडली आणि भारत हा गरीब देशांपैकी एक बनला. पण आता भारत आणखी वेगाने वाटचाल करत, स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षी भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून जगासमोर अभिमानाने उभा आहे.

‘भारत@75: इंडिया-यूएन पार्टनरशिप इन एक्शन’ (India@75: India-UN Partnership in Action) या कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी आपल्या भाषणात भारताच्या अर्थव्यवस्थेसह इतर अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. परराष्ट्र मंत्री म्हणाले की, अलीकडच्या काळात भारताने डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे अन्न सुरक्षा प्रणाली यशस्वीरित्या अपग्रेड केली आहे. याद्वारे सामान्य जनतेपर्यंत अन्नधान्य पोहोचलं आहे.

देशात होणाऱ्या डिजिटलायझेशनबद्दल बोलताना एस जयशंकर म्हणाले की, भारतात डिजिटल तंत्रज्ञानाचा चांगल्या प्रकारे वापर करत आहे. याचा जनतेला फायदा झाला आहे. भारतात डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने ८० कोटी लोकांना अन्न सुरक्षेअंतर्गत रेशन देण्यात आलं आहे. तसेच भारताने २०४७ पर्यंत विकसित देश बनण्याचे लक्ष्य ठेवलं आहे. देशातील दुर्गम गावं आणि शहरं डिजिटल करणे हे आमचे लक्ष्य आहे, ज्यावर आम्ही वेगाने काम करत आहोत, असंही परराष्ट्र मंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

आपल्या भाषणात एस जयशंकर यांनी भारत आणि संयुक्त राष्ट्रांसोबतच्या संबंधाबद्दल बोलताना सांगितलं कि , पृथ्वीची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आम्ही संयुक्त राष्ट्रांसोबतचे संबंध अधिक मजबूत करण्यासाठी वचनबद्ध आहोत. भारताचा संयुक्त राष्ट्रांच्या तत्त्वांवर आणि सनदेवर पूर्ण विश्वास आहे.

हे ही वाचा:

राष्ट्रीय सिनेमा दिनाच्या निमिताने,’चूप’ चित्रपटाच्या ओपनिंग डेला केली इतकी कमाई

कृषीमंत्री अब्दुल सत्तारांचा ताफा शिवसैनिकांनी अडवला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss