Monday, May 6, 2024

Latest Posts

BJP चा राग नक्की कुणावर आहे? काय आहे किरण मानेंची पोस्ट?

नेहमीच सोशल मिडीयावर सक्रीय असणारे अभिनेता किरण माने यांनी पुन्हा एकदा एक पोस्ट केली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी आणि एकूणच राजकीय परिस्थितीवर भाष्य केले आहे. या निवडणुकीत राहुल गांधी यांच्या न्याय योजना आणि मोदीजींचं हे भाषण ‘गेमचेंजर’ ठरणार असल्याचे किरण माने यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

काय म्हणाले किरण माने? 

आपल्या मुस्लीम बांधवांसंदर्भात माननीय पंतप्रधान महोदयांनी द्वेषपूर्ण भाषण केले आणि डाॅ. मनमोहनसिंग यांच्या वक्तव्यात फेरफार करून बदनामी होईल असे वक्तव्य केले. याबद्दल देशभरातून वीस हजारपेक्षा जास्त लोकांनी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला पत्र लिहिले आहे. अजूनही अनेकजण पत्रं पाठवत आहेत. संख्या वाढतच आहे. या अतिशय लाजीरवाण्या प्रकाराची जगभरातून छ्छी थ्थू होत आहे. टाइम मॅगझिन, वॉशिंग्टन पोस्ट, सीएनएन, बीसीसी इत्यादी आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही याबाबत संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. खरंतर माजी पंतप्रधान मनमोहनसिंग म्हणाले होते की, “देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मागास, दलित, वंचित आणि अल्पसंख्यांकांचा आहे.” भाजपाचा राग नक्की कुणावर आहे हे या घटनेमुळे उघड झाले आहे. यापुर्वी संपूर्ण देशात अनेक अल्पसंख्याक आणि दलित मतदार होते, जे भाजपाचं समर्थन करत होते… पंतप्रधानांच्या या दर्पोक्तीनंतर ते सगळेच्या सगळे खूप वेगाने भाजपच्या विरोधात एकत्र आले आहेत.

राजकीय विश्लेषकांचे मत आहे की…

विश्वासघाताची, संतापाची आणि उद्वेगाची लाट निर्माण झाली आहे. याउलट राहुल गांधी यांनी काॅंग्रेसच्या जाहीरनाम्यात दिलेल्या ‘न्याय योजनां’कडे ते सगळे आकर्षित झाले आहेत. राजकीय विश्लेषकांचे मत आहे की भारताच्या संपूर्ण इतिहासात यापूर्वी कुठल्याही पंतप्रधानांनी आपल्या वक्तव्याचा दर्जा इतका घसरू दिला नव्हता. या निवडणुकीत राहुल गांधी यांच्या न्याय योजना आणि मोदीजींचं हे भाषण ‘गेमचेंजर’ ठरणार हे नक्की !

हे ही वाचा:

PM Modi यांच्यामुळे आपला देश अर्थव्यवस्थांमध्ये…काय म्हणाले Dr. Shrikant Shinde?

इतका संघर्षमय होता ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा प्रवास

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss