बॉलीवूड इंडस्ट्रीतील कप्ल्स (couples) ,त्यांचे अफेअर्स (affairs),ब्रेकअप (breakup)या गोष्टी नेहमीच कानावर पडतात ,या काही वेगळ्या नाही. बॉलीवूड स्टार्सच्या (bollywood stars)अशा बऱ्याच गोष्टी दररोज कानावर पडत असतात. अशाच एका जोडीचे एका वेळी खूप चर्चा झाली होती.ती जोडी म्हणजे करिष्मा कपूर आणि अभिषेक बच्चन. त्यांच्या अफेअरची ही चर्चा बराच काळ रंगली असून एका पत्रकार परिषदेत अभिषेक बच्चनची आई जया बच्चन हिने करिश्माला स्वतःची होणारी सून असेही म्हटले होते.
एकावेळी बॉलिवूड इंडस्ट्रीत (bollywood industry) अभिनेता अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा होत्या. इतकंच नव्हे तर या दोघांनी साखरपुडा केला होता, असेही म्हटले जात होते . मात्र लग्न होण्याआधीच या दोघांचं नातं तुटलं. कपूर आणि बच्चन कुटुंबीयांमध्ये खास नातेसंबंध सुरू होण्याआधीच सर्वकाही संपलं . जया बच्चन यांनी एका पत्रकार परिषदेत करिश्माचा उल्लेख ‘माझी होणारी सून’ असा केला होता. माध्यमांसमोर त्यांनी करिश्मा आणि अभिषेकचं लग्न जाहीर केलं होतं. यावेळी मंचावर अभिषेक बच्चन ,अमिताभ बच्चन ,जया बच्चन,मुलगी श्वेता नंदा असे संपूर्ण बच्चन कुटुंबिय उपस्थित होतं. या पत्रकार परिषदेचा व्हिडीओ सध्या सोशल खूप जास्त मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये असे दिसत आहे की ,मंचावर संपूर्ण बच्चन कुटुंबीय उपस्थित असून मंचावर जया बच्चन बोलत आहेत.त्या असा बोलल्या की , “बच्चन आणि नंदा कुटुंबात आम्ही आणखी एका कुटुंबाचे स्वागत करत आहोत आणि ते म्हणजे कपूर कुटूंबाचं . रणधीर – बबिता कपूर आणि माझी होणारी सून करिश्मा कपूर. वडिलांच्या ६० व्या वाढदिवशी अभिषेकने आम्हाला दिलेली ही भेट आहे,” अशी घोषणा करत त्या करिश्माला मंचावर (stage)बोलावतात. त्याचवेळी करिश्मासुद्धा मंचावर येऊन जया बच्चन यांना मिठी मारते. त्यानंतर सर्वजण फोटोसाठी उभे राहतात.
या घटनेच्या बऱ्याच वर्षांनंतर दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी एका मुलाखतीत अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांच्या या तुटलेल्या नात्याबद्दलचा खुलासा केला होता. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत सुनील दर्शन म्हणाले होते, “अभिषेक-करिश्माच्या नात्याची अफवा नव्हती, ते सत्य होतं. ते दोघं लग्न करणार होते. मी स्वत: त्यांच्या साखरपुड्याला उपस्थित होतो.” या दोघांचं नातं फार काही काळ टिकणार नाही, अशी शंका सुनील दर्शन यांना चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच लागली होती. “अभिषेक आणि करिश्मा हे सेटवर नेहमीच एकमेकांशी भांडत असायचे . या दोघांची जोडी ‘मेड फॉर इच अदर’ (made for each other) अशी नव्हती. त्यांच्यात सतत भांडणे व्हायची . कदाचित काही लोकांचं नातं असंच असतं. मला नेहमीच प्रश्न पडायचा की खरंच हे दोघं एकमेकांसाठी बनले आहेत का? अभिषेक आणि करिश्मा दोघं स्वभावाने चांगले आहेत. पण दोघांच्या नशिबात एकत्र राहणं नव्हतं,” असं ते पुढे म्हणाले होते.
हे ही वाचा:
Ashadhi Wari, संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीने केला आज २० दिवसांचा टप्पा पूर्ण
“माझी ड्रॅगन क्वीन” बॉयफ्रेंड अनिश जोगने वाढदिवशी शेअर केला, सई ताम्हणकरचा खास विडिओ