मुंबई : ऋता दुर्गुळे ही अभिनेत्री तिच्या उत्कृष्ट अभिनयामुळे चाहत्यांमध्ये बरीच प्रसिद्ध आहे. सध्या ऋता टाईपास 3 च्या प्रमोशनमध्ये फार व्यस्थ आहे. ऋता ज्याप्रमाणे तिच्या उत्तम अभिनयासाठी ओळखली जाते, त्याचप्रमाणे ऋताचा स्वभाव देखील तितकाच छान आहे. सध्या असाच एक प्रसंग टाईमपास 3 च्या सेटवर घडला आहे. ज्यामधून ऋताचा मनमोकळा स्वभाव समोर आला आहे.
टाईमपास 3 सिनेमाची टीम नुकतीच एका मुलाखतीच्या दरम्यान एकत्र जमली होती. तेव्हा हृतासोबत काम करायचा अनुभव सांगताना कलाकारांनी तिच्यासोबत घडलेला हा किस्सा शेअर केला. हृतासोबत घडलेला किस्सा मनमित पेम या कलाकारानेसांगितला आहे. त्याने सांगितले आम्ही सगळे ऋताशी चांगले वागत होतो. पण आमच्या टीममधल्या जयेशने मनोज ऋताशीबोलताना पहिल्याच वाक्यात तिचा अपमान केला. आम्ही सगळे साई तुझं लेकरू गाण्याबद्दल चर्चा करत होतो. आणि हृता त्या गाण्याचा भाग नसणार होती. त्यामुळे ती बोलून गेली की अरेरे मी त्यामध्ये नाहीये. तेव्हा जयेश पटकन बोलून गेला, ‘हं मग मजा येईल’. त्याचं हे हृतासोबत झालेलं पहिलं संभाषण होतं आणि त्याने अशी काही गुगली फेकली की सगळेच चकित झाले. आणि हृताचा चेहरा सुद्धा बघण्यासारखा झाला.” यावर ऋता म्हणाली, मला याच काहीही वाटलं नाही. मी हि गोष्ट मनावर देखील घेतली नाहीए. उलट मी हि प्रोसेस अगदी एन्जॉय केली.
ऋताच्या कामाबाबदल बोलायचे झाले तर ऋता सध्या एकामागोमाग एक नवे प्रोजेक्ट्स करतेए, ऋताचा नुकताच आलेल्या ‘अनन्या’ सिनेमाने प्रेक्षकांना सिनेमागृहात येण्यास भाग पाडले. ऋताची सध्या सुरु असणारी मालिका ‘मन उडू उडू झालं’ यामालिवर प्रेक्षकांनी अगदी भरभरून प्रेम केलं. ऋताची हि मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ऋताने ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या नाटकांमधून आपल्या अभिनयाची एक वेगळी बाजु प्रेक्षकांना दाखवून दिली आहे. सध्या ऋताचे फॅन्स उत्सुक आहेत ते तिच्या येणाऱ्या आगामी सिनेमाविषयी तो ‘टाईमपास 3’ यामध्ये ऋता अगदी वेगळ्या भूमिकेतून आपल्या समोर येणार आहे. ‘पालवी’ असे तिच्या भूमिकेचं नाव असून, या सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळतोय.