काँग्रेस नेते आणि विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी काल (गुरुवार, २५ एप्रिल) झालेल्या सांगली (Sangali) जिल्ह्यातील काँग्रेस कमिटीच्या कार्यकारी मेळाव्यात बोलत असताना, ‘भाजपाला हद्दपार करण्याच्या उद्देशाने आघाडी म्हणून साथ दिली पाहिजे,’ असे वक्तव्य केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर सांगली लोकसभा मतदारसंघातून (Sangali Loksabha Constituency) महाविकास आघाडीतर्फे (Mahavikas Aghadi) काँग्रेसचा उमेदवार न दिल्यामुळे नाराज झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर त्यांनी आपल्या भावना मांडल्या.
यावेळी बोलताना विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, “२०१४ नंतर आलेले भाजपाचे सरकार वेगळ्या वाटेवर गेले, पुढच्या कालखंडात लोकशाही, राज्यघटना राहणार का बदलणार? देश वेगळ्या वळणावर जाईल का? अशी ही ऐतिहासिक निवडणूक आहे. देश हुकूमशाहीकडे चालला आहे, राज्यघटना पायदळी तुडवली, मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले. निवडणुका लागल्यानंतर काँग्रेस पक्षाची बँक खाती गोठवली. देशातील राजकीय परिस्थितीचा विचार करुन विरोधी पक्ष एकत्र आले व इंडिया आघाडीची (INDIA Alliance) स्थापना केली. राज्यातही महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) स्थापन करून एकत्रित निवडणुकीला सामोरे जात आहे. पहिल्या टप्प्यातील चित्र सकारात्मक दिसले आहे, भाजपाला रोखणे हे आपले लक्ष्य आहे. तीन पक्षांच्या जागा वाटपाचे काम सोपे नव्हते. सांगलीच्या जागेसाठी सर्व बाजूंनी दबाव होता, खूप चर्चा झाली. सांगलीच्या जागेसाठी दिल्लीतूनही प्रयत्न केला परंतु यश आले नाही. भाजपाला हद्दपार करण्याच्या उद्देशाने आघाडी म्हणून साथ दिली पाहिजे.”
या मेळाव्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम, सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार विक्रम सावंत, सांगली शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील, सांगली जिल्ह्याचे निरीक्षक माजी मंत्री रमेश बागवे यांच्यासह काँग्रेस नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे ही वाचा:
Modi-Shah यांना मराठी Mumbai योजनाबद्ध संपवायचीय, सांगतायत शिवसेना नेते Arvind Sawant
Sangali जिल्हा Congress ला द्रष्ट लावणाऱ्यांची द्रष्ट उतरवल्याशिवाय शांत बसणार नाही: Nana Patole
Follow Us