Friday, April 26, 2024

Latest Posts

विलास लांडेंच्या दाव्यावर अमोल कोल्हेची प्रतिक्रिया

राजकारणामध्ये सध्या लोकसभा निवडणुकीच्या चर्चा सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विलास लांडे यांनी २००९ मध्ये लोकसभा निवडणुक लढवली होती. परंतु त्यानंतर अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली होती.

राजकारणामध्ये सध्या लोकसभा निवडणुकीच्या चर्चा सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विलास लांडे यांनी २००९ मध्ये लोकसभा निवडणुक लढवली होती. परंतु त्यानंतर अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यावर विलास लांडे म्हणाले की, शरद पवार आणि अजित पवार यांनी त्यावेळी अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्याचे ठरवले होते आणि त्यावेळी त्यांना देखील देण्यात आली. मी आजच नाही तर १९९२ पासून राजकारणामध्ये आहे त्यामुळेच माझे भावी खासदार म्हणून फ्लेक्स लागले आहेत असे विलास लांडे म्हणाले.

शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीकडून कोणाला उमेदवारी मिळणार या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते विलास लांडे यांनी या शिरूर लोकसभेच्या निवडणुकीच्या जागेवर दावा केला आहे. यानंतर राष्ट्रवादीमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरु असल्याचे दिसून आले. राष्ट्रवादीमधून खासदार अमोल कोल्हे आणि विलास लांडे या दोघांमध्ये उमेदवारीसाठी कोण निश्चित होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विलास लांडे यांनी केलेल्या दाव्यावर खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, विकास लांडे हे २०२४ ची शिरूर लोकसभा लढण्यास इच्छुक आहे असे मला माध्यमांमधून समजले. कोणालाही महत्वकांक्षा असणे सजीवाबत गैर नाही म्हणून मी विलास लांडे यांना शुभेच्छा देतो. परंतु अजून पर्यत शर्यत संपलेली नाही कारण मी अजून जिंकलो नाही असे म्हणत अमोल कोल्हे यांनी आपण शिरूर लोकसभेच्या मैदानामध्ये आहेत असे स्पष्ठ केले. त्यामुळे पुण्यातील राजकारणात अनेक चर्चांणा उधाण आलं आहे.

हे ही वाचा:

खुशखबर!, LPG Gas Cylinder च्या दरात मोठी कपात, पाहा Latest Rates

Nitin Gadkari म्हणाले, ‘मंदिरांमध्ये स्वच्छतेचा अभाव आहे, मी…’

संजय शिरसाट यांना पोलिसांकडून दिलासा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss