मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंगचा रविवारी १४ एप्रिल रोजी सामना झाला. चौथा पराभव मुंबई इंडियन्सला करावा लागला. रोहित शर्माने एकट्यानेच जास्त धाव केल्या. या सामन्यादरम्यान मुंबई इंडियन्सचा अव्वल क्रिकेटपटू रोहित शर्मा याने IPL मधलं दुसरं शतक १२ वर्षांनी मारलं. त्याने १०५ धाव केल्या होत्या. पण त्याचा काय फायदा झाला नाही. कारण, मुंबईला २० धावांनी चेन्नई विरुद्ध हार पत्करावी लागली. यामुळे त्याच्या चेहर्यावर अजिबात आनंद दिसत नव्हता. वनडे वर्ल्ड २०२३ फायनलमध्ये पराभव झाल्यानंतरचे तसाच भाव चेहऱ्यावर दिसून येत होते. रोहित शर्माच्या शतकानंतर वानखेडे स्टेडियमवरील प्रेक्षक उभे राहिले. टाळ्या वाजू लागल्या. तरीसुद्धा रोहितने काहीच प्रतिसाद दिला नाही. ग्लोव्हजला पंच मारला नाही, बॅट उंचावली नाही. मोहम्मद नबी बरोबर स्ट्राइकवर जाण्यापूर्वी तो थोडं बोलला.
रोहित शर्माचा हे उत्तम शतक होते. पहिल्या चेंडूपासून तो प्रामाणिकपणे खेळत होता. ६३ चेंडूत त्याने १०५ धावा केल्या. यात ११ फोर आणि ५ सिक्स मारले. काही सिक्स तर स्टेडियम बाहेर गेले असणार. त्याने खूप सुंदर फलंदाजी केली होती. संपूर्ण मैदानात फटकेबाजी केली. शतक झळकवल्यानंतरही त्याने बॅट उंचावली नाही, हे मला आवडलं. पण दुर्देवाने काही वेळा सर्व गोष्टी तुम्ही एकट्याने नाही करु शकतं” असं ब्रेटली हा जिओ सिनेमावर म्हणाला.
हे ही वाचा:
खुसखुशीत पालक वडी आवडते? मग जाणून घ्या कृती…
आरोग्यासाठी गुणकारी अशा तुळशीच्या पानांचा उपयोग काय?