खासदार संजय राऊत यांनी नाशिक येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नाशिक येथील राहुल गांधींच्या सभेबद्दल त्यांचे मत व्यक्त केले. नाशिकमध्ये महाविकास आघाडीची सभा आहे. राहुल गांधी नाशिकला येत आहेत. नाशिकमध्ये त्यांचे जोरदार स्वागत होणार आहे. नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आमचे सगळे पदाधिकारी त्यांचे स्वागत करणार आहेत. नाशिकमध्ये आपण यजमान आहोत, असे संजय राऊत म्हणाले. जेव्हा देशाची लोकशाही संकटात असते तेव्हा मतभेद विसरून एकत्र यावे लागते. १९७८ मध्ये भाजपसह सगळे एकत्र का आले होते? शिवाजी पार्क मेळाव्याला उद्धव ठाकरे उपस्थित राहतील, असेही यावेळी संजय राऊत यांनी शिवतीर्थबाबत विचारलेल्या प्रश्नावर सांगितले.
राहुल गांधी सावरकरांच्या भूमीत येत आहेत. गुजरात लॉबीकडून मुंबईवर जे संकट येत आहे त्यावर त्यांनी बोलावे. सावरकर आमचा पंचप्राण आहेत, त्यामुळे राहुल गांधींनी सावरकरांवर बोलणे टाळावे असेही संजय राऊत म्हणाले.
हे ही वाचा:
Exclusive: Rahul Gandhi मुंबईत येण्याआधीच Sanjay Nirupam यांची ‘कल्टी’, Fadnavis दाखवणार दिशा
झी गौरव पुरस्कार सोहळ्यात अमेय वाघने वाचलेली कविता ऐकून श्रेयस आणि दिप्तीला अश्रू अनावर!