राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. आणि त्यामुळेचज राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर घातपात , सोन्या चिंदीचेही लूट, चोरी मंत्री , खून या सारखे गुन्हे वाढलेले बघायला मिळत आहे. जवळपास राज्यामध्ये गुन्हेगारी क्षेत्र वाढलेले बघायला मिळत आहे. आणि त्यामुळे जनतेमध्ये भीतीचे वातावरण दिसत आहे. या गुन्हेगारीवर अचूक ठेवण्यासाठ सरकारने काही ठोस पाऊले उचलावी गेली पाहिजे यासाठी आला घालणे गरजेचे झाले आहे. आणि गुन्हेगारावर वचक ठेवण्यात पोलीस विभाग कुचकामी ठरत असून समाजकंटकांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करुन कठोर कारवाई करावी अशी मागणी आ. सुधीर गाडगीळ यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली असून दिवसाढवळ्या दरोडे, लूट, खून यासारख्या गंभीर घटना घडत आहेत. नशेच्या गोळ्यांची विक्रीसह अवैध व्यवसाय जोमाने सुरु आहेत. गुन्हेगारावर वचक ठेवण्यात पोलीस विभाग कुचकामी ठरत असून समाजकंटकांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करुन कठोर कारवाई करावी अशी मागणी आ. सुधीर गाडगीळ यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
दोन दिवसापूर्वी पोलीस अधिक्षक कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या रिलायन्स ज्वेल्स या दुकानावर पिस्तुलाचा धाक दाखवत १४ कोटींची लूट झाली. महिलांचे दागिने लंपास करण्याचे प्रकार रोज घडत आहेत. महिलावरील अत्याचारात वाढ झाली आहे. नशेबाज तरुण राजरोसपणे सामान्यांना धमकावून, प्रसंगी मारहाण करुन लुटत आहेत. गंभीर प्रकार घडूनही पोलीस यंत्रणा सुस्त असून कायद्याचा गुन्हेगारांवर वचक राहिला नाही. तातडीने याची दखल घेऊन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी असे निवेदन आ. गाडगीळ यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना मंगळवारी दिले. याची दखल घेत फडणवीस यांनी चौकशी करुन कारवाई करण्याचे आश्वासन आ. गाडगीळ यांना दिले.
हे ही वाचा:
राज ठाकरे यांनी केला शिवाजी महाराजांना कॉल ???
Odisha Train Accident नंतर हजारो लोकांनी रेल्वे तिकिटे रद्द केली?