Saturday, April 27, 2024

Latest Posts

नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बच्चू कडूंनी केले मोठे विधान, आम्ही राणा यांचा..

सत्ताधारी पक्षांकडून महायुतीमधील अमरावती (Amravati) मतदारसंघातून विद्यमान खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

सत्ताधारी पक्षांकडून महायुतीमधील अमरावती (Amravati) मतदारसंघातून विद्यमान खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या कमळ चिन्हावर नवनीत राणा निवडणूक लढणार आहेत. मात्र नवनीत राणा यांना निवडणुकीचे तिकीट मिळाले असले तरीसुद्धा त्यांच्या अडचणी कमी झालेल्या नाही. नवनीत राणा यांना लोकसभेचे तिकीट मिळाल्याने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे (Shivsena) नेते आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच महायुतीमध्ये सहभागी असलेल्या प्रहार (Prahar) या पक्षाचे नेते बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनीसुद्धा नवनीत राणा यांना विरोध केला आहे.आम्ही अमरावती या जागेसाठी आमचा उमेदवार देणार आहोत. आम्ही राणा यांचा प्रचार करणार नाही, अशी ठाम भूमिका बच्चू कडू यांनी मांडली आहे.

कोणाला उमेदवारी द्याची हा भाजपचा निर्णय आहे. माझ्यासह जनतेत रोष आहे. हा रोष निकालात दिसणार आहे. नवनीत राणा यांना उमेदवारी दिली हे, चांगलंच झालं आहे. अब मजा आऐगा. प्रहारची भूमिका कायम आहे. येथे प्रहारचे अस्तित्व आहे. आम्ही नियोजनबद्द लढू. आम्ही नवनीत राणा यांचा प्रचार करणार नाही. आमची स्वत:ची पानटपरी (स्वत:चा पक्ष) आहे. आमच्यावर कोणीही दबाव टाकू शकत नाही. आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न विचारात घेऊन नियोजनबद्ध पद्धतीने निवडणूक लढू. आम्ही या जागेवर चांगला उमेदवार देऊ किंवा सक्षम उमेदवाराला पाठिंबा देऊ. सध्या आम्हाला कोणताही सक्षम उमेदवार वाटलेला नसून ४ तारखेपर्यंत त्याचा शोध घेऊ. सर्वांनी एकत्र येऊन झुंडशाही लोकशाहीचे पतन करणाऱ्या उमेदवारांना पाडण्याची जबाबदारी घ्यावी. नवनीत राणा यांचे पती रवी राणा हे भाजपच्या पालकमंत्र्यांना बालकमंत्री म्हणाले होते. मोदींच्या नावाने जी गुंडशाही सुरू आहे ती थांबली पाहिजे. प्रभू रामचंद्रचं नाव घ्यावं आणि बगलेत सुरी ठेवायची हे चालणार नाही, असे बच्चू कडू ठामपणे म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेते आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजित अडसूळ अमरावतीमधून अपक्ष म्हणून उमेदवार भरण्याच्या तयारीत आहेत. यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले, मला वाटतं सर्वांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे. रवी राणा यांनी भाजपचं कार्यालय फोडलं. कार्यालयात घुसून राणा यांनी भाजपचे पोस्टर्स फाडले.आता ज्यांनी पक्षाचे कार्यालय फोडले, त्यांचाच झेंडा हातात घेऊन भाजपच्या कार्यकर्त्यांना राणा यांचा प्रचार करावा लागणार आहे. मला वाटतं एवढी लाचारी अन्य कोणत्याही पक्षावर येत नसेल.आम्ही बोललो तर त्यांना राग येतो, असे बच्चू कडू म्हणाले.

हे ही वाचा:

लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता

विजय शिवतारेंनी घेतली मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट; भेटीनंतर शिवतारे भूमिका स्पष्ट करणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss