ही होळी सर्वांना सुखाची व समृद्धीची जावो, या राज्यातील जनतेला सुखाचे समाधानाचे दिवस येऊ दे, महाराष्ट्राच्या तमाम जनतेला होळी व धुळवडीच्या शुभेच्छा असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातून होळीच्या शुभेच्छा दिल्या. ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धुलिवंदनचा आनंद घेतला. यावेळी उपस्थित माध्यम प्रतिनिधींशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला.
राज्यसरकारने अनेक निर्णय घेतले आहेत. राज्य व केंद्र सरकार मिळून या राज्याचा विकास करत आहोत. सर्वांनी रासायनिक रंगांचा वापर करुन होळी साजरी करावी आणि आज राजकारण नको, फक्त आनंद साजरा करु. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होळीच्या शुभेच्छा देतांना म्हणाले. यासोबतच, डबल इंजिन सरकार बुलेट ट्रेनच्या वेगाने प्रगती करत असल्याचे यावेळी माध्यमांशी बोलतांना एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
हे ही वाचा:
आंबेडकरांनी आमच्यासोबत असावं कारण…काय म्हणाले Sanjay Raut?
महाराष्ट्राच्या राजकारणाचा रंग भगवा – Dr. Shrikant Shinde
Follow Us