Wednesday, May 1, 2024

Latest Posts

अनंत चतुर्दशीचे महत्व, जाणून घ्या सविस्तर माहिती

गणपती बाप्पाच्या आगमनानंतर आता बाप्पाला निरोप देण्याचा वेळ जवळ आला आहे. दहा दिवसाच्या बाप्पाचे उद्या विसर्जन होणार आहे.

गणपती बाप्पाच्या आगमनानंतर आता बाप्पाला निरोप देण्याचा वेळ जवळ आला आहे. दहा दिवसाच्या बाप्पाचे उद्या विसर्जन होणार आहे. गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशी खूप महत्त्वाचे मानले जाते. दहा दिवसांच्या गणरायाचा संबंध महाभारताशी जोडला गेला आहे. अनंत चतुर्दशीला भगवान विष्णूच्या रूपाची पूजा केली जाते. यंदा अनंत चतुर्दशी २८ सप्टेंबर रोजी आली आहे. यादिवशी गणेश उत्सव संपून बाप्पाचे विसर्जन केले जाते.

हिंदू धर्मात अनंत चतुर्दशीला खूप महत्व आहे. या पूजेनंतर अनंत धागा बांधण्याची पद्धत आहे. या धाग्याला १४ गाठी मारल्या जातात. हा धागा कापूस किंवा रेश्मापासून बनवला जातो. स्त्रिया डाव्या हातात आणि पुरुष उजव्या हातात बांधतात. अनंत धागा बांधल्याने सर्व दु:ख आणि संकटे दूर होतात अशी धार्मिक मान्यता आहे. अनंत चतुर्दशी साजरा करण्याचा उल्लेख महाभारतमध्ये सुद्धा केला आहे. पुराणानुसार पांडवांनी जुगारात आपले संपूर्ण राज्य गमावले होते. त्यानंतर त्यांना १२ वर्षांचा वनवास आणि एक वर्ष अज्ञातवासात घालवावा लागला . या काळात पांडवांनी आपले वचन पूर्ण करण्यासाठी जंगलात वास्तव्य केले होते. त्यावेळी युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णांला आपले राज्य परत मिळवण्याचा आणि दुःख दूर करण्याचा मार्ग विचारला होता. तेव्हा श्रीकृष्णाने त्यांना सांगितले की जुगारामुळे माता लक्ष्मी तुझ्यावर नाराज आहे. तुम्हाला तुमचे राज्य परत मिळवायचे असेल तर तुम्ही अनंत चतुर्दशीचे व्रत कराआणि भगवान विष्णूची पूजा करा. हे व्रत केल्याने तुम्हाला सर्व काही परत मिळेल. यानंतर श्रीकृष्णाने युधिष्ठिराला व्रताचे महत्त्व सांगणारी कथाही सांगितली. यानंतर युधिष्ठिराने अनंत चतुर्दशीचे व्रत केले आणि पांडवांना त्यांचे राज्य परत मिळाले.

प्राचीन काळात एक तपस्वी ब्राह्मण राहत होता. त्याचे नाव सुमंत आणि पत्नीचे नाव दिक्षा होते. त्या दोघांना सुशीला नावाची पुण्यवान मुलगी होती.सुशीलाचा विवाह ब्राह्मण कौंदिन्य ऋषीशीही झाला. त्यानंतर वाटेत रात्र झाली म्हणून तो एका नदीकाठी थांबला आणि संध्याकाळी भगवंताचे नामस्मरण करू लागला.त्याचवेळी सुशीलाला अनेक स्त्रिया कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा करताना दिसल्या. सुशीलाने त्या स्त्रियांना पूजेबद्दल विचारले तेव्हा त्यांनी तिला भगवान अनंतांची पूजा आणि त्याचे महत्त्व सांगितले. सुशीलानेही त्याच वेळी व्रत केले आणि १४ गाठींचा धागा बांधून कौंदिन्याकडे आली. कौंदिन्याने सुशीलाला त्या धाग्याबद्दल विचारले तेव्हा सुशीलाने त्याला सर्व प्रकार सांगितला. कौंदिन्याने हे सर्व स्वीकारण्यास नकार दिला आणि तिच्या हातावर बांधलेला अनंत धागा काढून आगीत टाकला. यानंतर त्याची सर्व संपत्ती नष्ट झाली आणि तो दुःखी राहू लागला.खूप दिवस होऊन गेल्यानंतर कौदिन्याने सुशीलाला या गरिबीचे कारण विचारले तेव्हा तिने भगवान अनंतांचा धागा जाळल्याची आठवण करून दिली. त्यानंतर त्याने जंगलात शोधाशोध करायला सुरुवात केली पण ती धागा सापल्डला नाही. त्यानंतर तिथे भगवान विष्णू प्रकट झाले. तेव्हा ते कौंदिन्याला उद्देशून म्हणाले, तू माझा खूप तिरस्कार केला होतास ना म्हणून तुला खूप त्रास सहन करावा लागला. आता तू घरी जाऊन अनंत चतुर्थीचे व्रत कर. १४ वर्षे उपवास केल्यावर तुझे दुःख दूर होईल आणि तू धनवान होशील. त्यानंतर कौंदिन्याने अनंत चतुर्दशीचे व्रत केले आणि त्याची सर्व संकटातून सुटका झाली.

हे ही वाचा: 

पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचा इतिहास घ्या जाणून

पुण्यातील भाऊसाहेब रंगारी वाडा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss